शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

दहा लाख टन ऊस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:32 IST

कोल्हापूर विभागाची परिस्थिती : हंगाम एप्रिलमध्यापर्यंत लांबणार

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असला तरी विभागात अजून दहा लाख टन ऊस शिल्लक आहे. हा ऊस उचलण्यासाठी कारखान्याच्या तोडणी यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. विभागातील ३८ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २ कोटी १६ लाख ८ हजार ३९८ टन गाळप केले असून, आतापर्यंतचे हे उच्चांकी गाळप झाले आहे. १० एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात विभागातील बहुतांशी साखर कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. गेले पाच महिने अखंडितपणे हंगाम सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाचे उत्पादन कमी मिळणार असे आडाखे साखर कारखान्यांचे होते, पण गतवर्षीपेक्षा जादा गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला. दिवसाला सरासरी ६३ हजार टन गाळप करत आतापर्यंत १ कोटी ३८ लाख ९२ हजार २२५ टन उसाचे गळीत केले आहे. सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी रोज ३४ हजार टन गाळप करत ७७ लाख १६ हजार १४३ टनांचे गळीत केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ९, तर सांगलीमधील ८ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अजून विभागात १0 लाख टन ऊस शिल्लक असून, जवाहर-हुपरी व दत्त-शिरोळ वगळता सर्व कारखान्यांची धुराडी १० एप्रिलपर्यंत थंड होणार आहे. साधारणत: यंदा २ कोटी २५ लाख टन गाळप होईल, असा अंदाज असून कारखाना प्रशासनाने यंत्रणा सक्रिय केली आहे. याचा संपला हंगाम : गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी. याचा संपला हंगाम : गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी.