शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

दहा लाख टन ऊस शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 00:32 IST

कोल्हापूर विभागाची परिस्थिती : हंगाम एप्रिलमध्यापर्यंत लांबणार

कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असला तरी विभागात अजून दहा लाख टन ऊस शिल्लक आहे. हा ऊस उचलण्यासाठी कारखान्याच्या तोडणी यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. विभागातील ३८ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २ कोटी १६ लाख ८ हजार ३९८ टन गाळप केले असून, आतापर्यंतचे हे उच्चांकी गाळप झाले आहे. १० एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखाने बंद होण्याची शक्यता आहे. यंदाच्या हंगामात विभागातील बहुतांशी साखर कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. गेले पाच महिने अखंडितपणे हंगाम सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाचे उत्पादन कमी मिळणार असे आडाखे साखर कारखान्यांचे होते, पण गतवर्षीपेक्षा जादा गाळप झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला. दिवसाला सरासरी ६३ हजार टन गाळप करत आतापर्यंत १ कोटी ३८ लाख ९२ हजार २२५ टन उसाचे गळीत केले आहे. सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी रोज ३४ हजार टन गाळप करत ७७ लाख १६ हजार १४३ टनांचे गळीत केले आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ९, तर सांगलीमधील ८ कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अजून विभागात १0 लाख टन ऊस शिल्लक असून, जवाहर-हुपरी व दत्त-शिरोळ वगळता सर्व कारखान्यांची धुराडी १० एप्रिलपर्यंत थंड होणार आहे. साधारणत: यंदा २ कोटी २५ लाख टन गाळप होईल, असा अंदाज असून कारखाना प्रशासनाने यंत्रणा सक्रिय केली आहे. याचा संपला हंगाम : गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी. याचा संपला हंगाम : गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी.