शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

शिरोली दुमाला येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दहा बकऱ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:17 IST

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त वृत्तानुसार एकनाथ पाटील यांच्या मालकीच्या गुरवाची खडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या बागेत रघुनाथ विठ्ठल गावडे ...

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त वृत्तानुसार एकनाथ पाटील यांच्या मालकीच्या गुरवाची खडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या बागेत रघुनाथ विठ्ठल गावडे (रा. सावरवाडी) यांचा चारशे बकऱ्यांचा तळ गेली चार दिवस बसला होता. गुरुवारी मध्यरात्रीही माॅन्सूनपूर्व पाऊस सुरू होता.

मेंढपाळ लोक रात्रीच्या वेळी नजीकच्या शेडमध्ये झेपी गेल्याने मेंढपाळांच्या कळपात शांतता होती. मध्यरात्री बकऱ्यांच्या तळावर वनप्राण्यांनी हल्ला केल्याचे सकाळी कळपात मेंढपाळ लोक गेल्याने त्यांच्या निर्देशनास आले. या हल्ल्यात दहा बकरी मृत्यू पावल्याचे पाहणीत आढळले. या घटनेमुळे मेंढपाळ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, वन विभागाचे अधिकारी डॉ. ए. एस. इंगळे, डॉ. ए. एस. माने, वनरक्षक विजय पाटील, यशवंत क्रांती संघटनेचे करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, बाबासाहेब धनगर आदींनी त्वरित धाव घेऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला.

फोटो ओळ : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील गुरवाची खडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री बकऱ्यांच्या कळपावर वन प्राण्यांनी हल्ला केला. या घटनेत दहा बकऱ्यांचा मृत्यू झाला.