शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

वडाची फांदी पडून टेम्पोचालक गंभीर

By admin | Updated: June 30, 2017 15:47 IST

चालक शाहूवाडीचा : कोल्हापूरात हलविले

आॅनलाईन लोकमत राजापूर : दि. ३0 : तालुक्यातील रायपाटण येथे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनावर झाड पडून एकजण ठार झाल्याची घटना आठवडाभरात घडलेली असताना बुधवारी सकाळी शहरातील वरचीपेठ येथे मारूती मंदिरालगत असलेल्या वडाच्या झाडाची फांदी टेम्पोवर कोसळल्याने टेम्पोचालक गंभीर जखमी झाला. जखमी चालकाला कोल्हापूर येथे हलविण्यात आले.

राजापूर तालुक्यात बुधवारी मुसळधार पाउस सुरु होता. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी दिवसभर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे अनेकांनी शेतीची कामे न करण्याचे ठरवले. राजापूर शहर परिसरातही बुधवारी दिवसभर पाउस पडत होता. शहरातील वरचीपेठ येथील मारूती मंदिरालगत असलेल्या जुनाट वडाच्या झाडाची फांदी बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास रस्त्यावरून जाणाऱ्या टेम्पोवर झाडाची फांदी पडल्याने टेम्पो चालक गंभीर जखमी झाला.

या घटनेबाबत वरचीपेठ परिसरात माहिती मिळताच तेथील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत टेम्पोत अडकलेल्या चालकाला बाहेर काढून राजापूर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. नानासोा शामराव बुककाम (३०, शाहूवाडी, कोल्हापूर) असे जखमी चालकाचे नाव आहे. जखमी चालकावर राजापूर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले.

घटनेबाबतची माहिती मिळताच राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, नायब तहसीलदार राजेंद्र बिर्जे, तलाठी भालेकर आदींनी घटनास्थळी भेट घेऊन पाहणी केली. महेश बाकाळकर यांनी कटरच्या सहाय्याने झाड कापून बाजूला केले. झाड हटविण्यासाठी वरचीपेठ येथील ग्रामस्थ व तरूणांनी विशेष मेहनत घेतली. झाडाच्या मोठ्या फांद्या जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आल्या.

रस्त्यातच कोसळलेल्या झाडामुळे शीळ, गोठणे-दोनिवडे, चिखलगाव मार्गावरील एस. टी. फेरी बंद ठेवण्यात आली होती. बुधवारी दुपारपर्यंत झाड हटविण्याचे काम सुरू होते. दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रायपाटण येथे अशाच प्रकारे धावत्या वाहनावर झाड कोसळून एका तरूणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांचा विषय ऐरणीवर आला आहे. एवढे प्रकार घडूनही धोकादायक झाडांबाबत दुर्लक्ष का? असा सवाल करण्यात येत आहे.

बांधकाम विभागाने धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले आहे. मात्र, अद्याप एकही झाड तोडलेले नाही. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर धोकादायक झाडे तोडणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.