शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

मंदिर वादास ब्राह्मण-ब्राह्मणेतर रंग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 01:07 IST

संघर्ष समिती, श्रीपूजकांचे आवाहन : पोलीस मुख्यालयात सलोखा बैठक; सोशल मीडियाद्वारे तेढ निर्माण केल्यास कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : कोल्हापुरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी संघर्ष समिती आणि श्रीपूजक यांना सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. या दोन्हीही समित्यांच्या सदस्यांची स्वतंत्र बैठक गुरुवारी पोलीस मुख्यालयात घेण्यात आली. त्याप्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. दरम्यान, दोन्ही बैठकीत सदस्यांनी या प्रकरणास ब्राह्मण-ब्राह्मणेतर असा रंग न देण्याचे आवाहन केले. सोशल मीडियामार्फत समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही नांगरे-पाटील यांनी यावेळी दिली.या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक संजय मोहिते, शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, निशिकांत भुजबळ, शशिकांत पाटोळे, आदी अधिकारी उपस्थित होते.प्रथम श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये शहरात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेबाबतची माहिती घेण्यात आली. भविष्यात या प्रश्नाने भीषण स्वरूप धारण करू नये, म्हणून येणाऱ्या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे, असे आवाहन समितीच्या सदस्यांना विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांनी यावेळी केले. त्याबाबत त्यांनी सदस्यांना सूचना केल्या. या बैठकीत (पान ६ वर)सोशल मीडिया सेलची मदत घेणारअंबाबाई मंदिरातील वादाबाबत सोशल मीडियावरून समाजात तेढ निर्माण करण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. काहीजण समाजातील वाद भडकविणाऱ्या क्लिप मोबाईलवर टाकत आहेत. असे संदेश पाठविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासाठी मुंबईतील सोशल मीडियाच्या सेलची मदत घेण्यात येणार आहे. काहींना धमकीची पत्रे आली आहेत; त्याबाबत तपास सुरू असून, त्याला शोधून त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.