शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

देऊळ बंदने कोलमडले आर्थिक गणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:16 IST

कोल्हापूर : कोरोनामुळे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील एक देवता करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबा यासह कोल्हापुरातील सर्व मंदिरे गेल्या अडीच ...

कोल्हापूर : कोरोनामुळे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील एक देवता करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जोतिबा यासह कोल्हापुरातील सर्व मंदिरे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असल्याने देव आणि भक्ताची भेट दुर्लभ झाली आहे. दुसरीकडे मंदिरांवर अवलंबून असलेल्यांचे व्यवसाय बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे देवा आता कोरोनाचा कहर कमी कर, मंदिराचे दार उघड, अशी याचना भाविक, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिक करत आहेत.

गेल्यावर्षी देशात काेरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चला देशातील सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर, जोतिबा या प्रमुख मंदिरांसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित असलेल्या व नसलेल्या सर्वच मंदिरांचे दरवाजे भाविकांसाठी बंद करण्यात आले. आठ महिन्यांनी दिवाळी पाडव्याला ही मंदिरे भाविकांसाठी ठराविक वेळेची मर्यादा घालून सुरू करण्यात आली. नोव्हेंबर ते एप्रिलचा पहिला आठवडा या पाच महिन्यांतच मंदिरे सुरू होती. कोराेनाच्या भीतीने भाविक संख्यादेखील कमीच होती. पर्यटकांची गर्दी कमी झाली होती. सगळे सुरळीत होत आहे, असे म्हणतानाचा एप्रिलमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि १२ एप्रिलपासून पुन्हा मंदिरे बंद करण्यात आली. आता जून महिनादेखील संपत आला आहे. गेली अडीच महिने मंदिरे बंद असल्याने रोज नित्यनेमाने येणाऱ्या भाविकांसह एखाद्या औचित्याच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन आल्या पावली परत फिरावे लागत आहे. दुसरीकडे मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांना अर्थार्जनाचे साधनच उरलेले नाही. परंपरागत चालत आलेला व्यवसाय होत नाही आणि दुसरा व्यवसाय करता येत नाही, अशी त्यांची अडचण आहे. त्यामुळे कर्ज काढून घर चालवायचे, ज्यांना तेदेखील मिळत नाही त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचीच वेळ आली आहे.

---

गेली पंधरा महिने व्यवसाय ठप्प आहे. दुष्काळात तेरावा महिना यावा, अशी अवस्था झाली आहे. आमचा व्यवसाय पर्यटकांवर चालतो, परगावचे भाविक नाहीत, स्थानिक नागरिकांकडून या साहित्यांची किरकोळ प्रमाणात खरेदी केली जाते. दीड वर्षापूर्वी भरलेले साहित्य तसेच पडून आहे, घर चालवायला पैसे नाहीत म्हणून दर कमी करून मिळेल त्या किमतीत विक्री चालू आहे.

नीलेश निकम (पूजा साहित्य विक्रेता)

--

फुलं नाशवंत वस्तू आहे. विक्री झाली नाही की कुजून जातात, विकत आणलेली फुलं कोंडाळ्यात टाकताना घालमेल होते. मंदिर चालू होते तेव्हा भाविक देवीसाठी हार, वेणी न्यायचे, आता कोणी येत नाही. दिवसभर बसून ३० ते १०० रुपयांपर्यंत व्यवसाय होतो. एवढ्या पैश्यात कुटूंबाची गरज कशी भागवायची?

जरीना सय्यद (फूल, हार व्यावसायिक)

--

मुलीचं लग्न ठरलंय म्हणून अथणीवरून अंबाबाईच्या दर्शनासाठी आलोय, देवीला साडीचोळी मंगळसूत्र अर्पण करायचं होतं. पण दर्शनासाठी आत सोडेनात. मोठ्या श्रद्धेने आणलेले साहित्य मंदिराच्या दारात ठेवावं लागलं. दर्शन मिळालं नाही, याचं वाईट वाटतंय.

पूजा हेब्बाळ (अथणी)

--

आम्ही इथे शिवाजी पेठेत राहतो. अंबाबाईची दुपारची आरती मी कधी चुकवली नाही, शुक्रवारच्या पालखीला तर हमखास असते. लॉकडाऊन झाल्यापासून मंदिरात जाता आलेले नाही. महाद्वारातून कसंबसं देवीचं मुखदर्शन होतंं. पण त्यात मनाचं समाधान होत नाही. कोरोना कमी हाेऊन लवकर मंदिरे पून्हा भाविकांसाठी खुली व्हायला हवीत.

मंगल साळोखे (गृहिणी)

--

आम्ही पिढ्यानपिढ्या देवीची सेवा करत आलो आहोत, त्यातून उत्पन्न मिळावे हा हेतू कधीच नव्हता. पण अंबाबाईच्या नित्य व नैमित्तीक धार्मिक विधी पार पाडण्यासाठी सेवेकरी आणि मदतनीस असे १०० जण येथे कार्यरत आहेत, त्यातील अनेकजणांचे कुटूंब यावरच अवलंबून आहेत. देवीच्या कृपेने आजवर आम्ही सांभाळून घेत आलो आहाेत.

- माधव मुनिश्वर (सचिव, करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ)

--

फोटो नं २२०६२०२१-कोल-अंबाबाई मंदिर०१

ओळ : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर लाॅकडाऊनमुळे बंद असल्याने मंगळवारी महाद्वारामधून भाविक देवीचे दर्शन घेत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--

०२

एरवी भक्तांच्या गर्दीने गजबजणारे मंदिर भाविकांविना सुनेसुने होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

--