शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

सांगा, काय असेल कोल्हापूरचे भवितव्य

By admin | Updated: August 24, 2014 00:40 IST

शासन, प्रशासन, शिक्षणक्षेत्राला तरुणाईचा प्रश्न : ‘सतेज युथ फेस्ट २०१४’चे शानदान उद्घाटन

कोल्हापूर : शिक्षण रोजगाराभिमुख कसे कराल, टोलचा प्रश्न कधी सुटणार, महालक्ष्मी मंदिर परिसरातील दुर्गंधी-अस्वच्छतेमुळे पर्यटकांसमोर कोल्हापूरची नाचक्की होत नाही का, अभ्यासू मुलांवर अन्याय करीत खेळाडूंना थेट प्रशासनात नोकरी दिली जाते, तेव्हा त्यांची पात्रता तपासली जाते का, मुलींच्या छेडछाडीला लगाम कसा घालाल... एकीकडे सर्वधर्म समानता सांगितली जाते, तर दुसरीकडे कमी टक्केवारी असलेल्या मुलांना आरक्षणाचा लाभ का दिला जातो... अशा विविध प्रश्नांद्वारे तरुणाईने शासन, प्रशासन आणि शिक्षणक्षेत्रासमोर आपल्या मनातील कल्लोळ व्यक्त केला. त्यांच्या या प्रश्नांना उत्तरे देत २०२० साली कोल्हापूर सर्वांगांनी विकसित झालेले शहर असेल, अशी ग्वाही यावेळी मान्यवरांनी दिली. ‘मार्गदर्शनपर भाषण’ या उद्घाटनाच्या पद्धतीला फाटा देत ‘सतेज युथ फेस्ट’ या महोत्सवाचे उद्घाटन ‘कोल्हापूर २०२०’ या संवादात्मक कार्यक्रमाने झाले. यात गृहराज्यमंत्री सतेज पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. मनोजकुमार शर्मा, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सुभेदार यांनी तरुणाईने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. कोल्हापूरची विमानसेवा कधी सुरू होणार? या प्रश्नावर सतेज पाटील यांनी एअरलाईन्स कंपन्यांमुळे टेक आॅफ झालेला नाही; मात्र लवकरच ही सेवा सुरू होईल, असे सांगितले. धार्मिक आरक्षणामुळे कमी टक्केवारी असलेल्या मुलांना सोयी-सवलती आणि कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो आणि हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, यावर पाटील यांनी आर्थिक निकषांवर आरक्षण जाहीर व्हावे, असा मतप्रवाह असल्याचे सांगितले. जिल्हा पोलीसप्रमुख शर्मा यांनी मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दोन महिन्यांत प्रत्येक महाविद्यालयात तक्रार पेटी ठेवली जाईल व महाविद्यालयाच्या समितीवर एका महिला कॉन्स्टेबलची नेमणूक केली जाईल, असे सांगितले. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या संधी मिळत नाहीत; यावर सर्वच मान्यवरांनी ग्रामीण भागातील मुले शहरी मुलांच्या तुलनेत अधिक हुशार असतात. शिवाय संघर्षाची तयारी असल्याने गेल्या काही वर्षांत या मुलांनी एमपीएससी, यूपीएससी परीक्षांमध्ये यश मिळवले असून, आम्हीही ग्रामीण भागातूनच आलो असल्याचे सांगितले. राज्य शासनाची भूमिका टोल रद्दचीच...४कोल्हापूरच्या टोल प्रश्नावर गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, ज्यावेळी हा प्रकल्प कोल्हापुरात आला तेव्हा त्याला विरोध नव्हता. पुढे प्रकल्पाविषयी शंका निर्माण झाल्यानंतर रस्त्यांचे मूल्यांकन सुरू झाले. शहरात रस्ते झालेत म्हणजे प्रकल्पाचे पैसे कुणीतरी भागवावेच लागणार. राज्य शासनाची भूमिका टोल रद्दचीच आहे. याबाबत लवकरात लवकर निर्णय होईल. ४पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय करीत आंतरराष्ट्रीय खेळांत पदके मिळविलेल्या खेळाडूंना थेट प्रशासनात उच्च पद दिले जाते. त्यासाठी ती व्यक्ती खरेच पात्र आहे का, याचा विचार केला जावा. सुहास खामकरने जे काही केले, त्या अनुभवातून पदाचा वापर कशासाठी केला जातो, याचा विचारही शासनाने करावा आणि त्याचे निकष बदलावेत, अशी मागणी एका विद्यार्थिनीने केली.