शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

तेजस्विनी, राही, अंजली यांना राज्य शासनाचे बळ

By admin | Updated: May 20, 2015 00:15 IST

आॅलिम्पिक तयारी : प्रत्येकी पाच लाखांची मदत

कोल्हापूर : पुढील वर्षी होणाऱ्या ब्राझील आॅलिम्पिकच्या तयारीसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, राही सरनोबत आणि अंजली भागवत यांना राज्य शासनाने क्रीडा संचालनालयाच्या माध्यमातून पाच लाखांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांना देण्यात आला आहे.तेजस्विनी, राही आणि अंजली या महाराष्ट्राच्या सुवर्णकन्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा नावलौकिक केला आहे. त्याची नेमबाजीतील कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. आॅलिम्पिकमध्ये निवड होण्यासाठी चांगले गुणांकन आणि तयारी आवश्यक असते. त्यासाठी या नेमबाजपटूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे लागते. मात्र, या स्पर्धेसाठी होणारा खर्च स्वत: करणे परवडणारे नसते. त्यामुळे तेजस्विनी, राही व अंजली यांनी अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याची मागणी राज्य शासनाकडे लेखी पत्राद्वारे केली होती. त्याची दखल घेत आणि या सुवर्णकन्यांच्या कामगिरीचा आलेख वाढत राहावा तसेच ब्राझील येथील रिओ दि जेनेरिओ याठिकाणी २०१६ मध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेची तयारीसाठी त्यांना आर्थिक पाठबळ कमी पडू नये. यासाठी शासनाने त्यांना प्रत्येकी पाच लाखांची मदत केली आहे. त्यातील तेजस्विनीला गेल्या तीन दिवसांपूर्वी शासनाने मदतीचा धनादेश दिला आहे. स्पर्धेनिमित्त सध्या राही व अंजली देशाबाहेर आहेत. त्यांच्या कुटुंबीयांकडे मदतीचा धनादेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)परफॉर्मन्स सुधारण्यासह गुणांकन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणे आवश्यक असते. मी, अंजली आणि राहीने वैयक्तिकपणे खर्च करून काही स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. पण, वारंवार असा खर्च करणे आम्हाला जिकिरीचे ठरत होते. त्यामुळे आम्ही आर्थिक मदतीसाठी राज्य शासनाला विनंती केली. शासनाने त्याची तातडीने दखल घेत आम्हाला मदत केल्याचा आनंद आहे. शासनाने दिलेले पाठबळ आॅलिम्पिकसाठीच्या परफॉर्मन्स वाढीसाठी निश्चितपणे उपयोगी ठरेल.- तेजस्विनी सावंत, नेमबाजपटू