शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

‘अब की बार २२० पार’ म्हणणाऱ्यांचे दात घशात घातले --राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 15:04 IST

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे चार अशा नऊजणांना घरचा रस्ता दाखविण्यात यश आल्याचे सांगितले.

ठळक मुद्दे३७० च्या तुणतुण्यासमोर शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पडल्याची खंत

कोल्हापूर : ‘अब की पार २२० पार’ म्हणणाºया भाजपच्या घशात दात घालण्याचे काम आम्ही केले आहे. पळणारी उंदरे थांबवली असती आणि काँग्रेसच्या नेत्यांनी अजून जरा कणखरपणा आणि आक्रमकपणा दाखवला असता तर राज्यात सत्तांतर अटळ होते. कलम ३७० च्या तुणतुण्यासमोर शेतक-यांचे प्रश्न मांडण्यात आम्ही कमी पडलो, अशी खंत ‘स्वाभिमानी’चे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केली.

निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीत शिवसेनेचे पाच आणि भाजपचे चार अशा नऊजणांना घरचा रस्ता दाखविण्यात यश आल्याचे सांगितले. शेतक-यांच्या प्रश्नांवर निवडणुका लढविल्याच गेल्या नाहीत. कर्जमाफी, आत्महत्या, महापूर, दुष्काळ, बेकारी हे मुद्दे प्रकर्षाने पुढे आले नाहीत. त्यामुळे असंतोष एकवटता आला नाही, असे सांगितले.

देवेंद्र भुयार या ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्याने अमरावतीत मोरसी येथे कृषिमंत्री अनिल बोंडे यांना पराभूत करण्याचा केलेला पराक्रम कौतुकास्पद आहे. शिरोळमध्ये मात्र सावकार मादनाईक यांचा पराभव चटका लावणारा आहे. येथे पैसा जिंकला आहे, शेतकरी आणि चळवळ हरली आहे. चळवळीने शेतकºयांना पैसा मिळवून देऊनदेखील त्यांना पैशापुढे पराभव पत्करावा लागतो, ही बाबच क्लेशदायक आहे, अशी खंतही शेट्टी यांनी व्यक्त केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर