शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

शिक्षक करणार विद्यार्थ्यांमध्ये कोरोना जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:19 IST

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा उपयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधातील अस्त्र म्हणून करण्यात येणार असून या ...

कोल्हापूर : गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा उपयोग कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधातील अस्त्र म्हणून करण्यात येणार असून या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाविषयीची जागृती करणार आहेत. आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या संकल्पनेतून कोरोना : बालक जागृती अभियान राबवण्यात येणार असून हा राज्यातील पहिला प्रयोग आहे. याबाबत रविवारी सकाळी ११ वाजता जिल्ह्यातील सर्व शिक्षक-प्राध्यापकांशी ऑनलाइन संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी दिली.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोक्याची असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जागृती हेच महत्त्वाचे अस्त्र आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाबद्दल जागृती व्हावी, स्वत:ची काळजी कशी घ्यावी याबाबत त्यांना माहिती मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी आमदार आसगावकर यांनी कोरोना : बालक जागृती अभियान ही संकल्पना गुरुवारी पालकमंत्री पाटील यांच्यासमोर मांडली, सायंकाळी त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून अभियानाची सुरुवात करण्याचा निर्णय झाला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

बालवाडी ते बारावी...

विद्यार्थी व पालकांना शिक्षक कोरोनाबाबत मार्गदर्शन, समुपदेशन करतील. या अभियानात बालवाडी ते १२ वी पर्यंतचे सर्व शिक्षक, प्राध्यापक व मुख्याध्यापक सहभागी होतील.

रविवारी मार्गदर्शन

अभियानाची माहिती व ती कशी राबवायची याबाबत रविवारी सकाळी अकरा वाजता जिल्ह्यातील १ हजाराहून अधिक शिक्षकांना ऑनलाइन संवादातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अभियानात मुलांनाही सहभागी करून घेत त्यांच्या माध्यमातून पालकांमध्येही जागृती करण्यात येणार आहे.

--

जिल्हानिहाय टास्क फोर्स

आरोग्य यंत्रणा व प्रशासनाला अधिकाधिक बालकांपर्यंत पोहोचता यावे, यासाठी जिल्हानिहाय टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार असून त्यात शिक्षक, डॉक्टर, समुपदेशक, स्थाानिक पदाधिकाऱ्यांचा समावेश असेल. कोल्हापूरनंतर अन्य जिल्ह्यात ते स्थापन केले जातील.

--