शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांकडून शासनाचा दशविधी

By admin | Updated: June 11, 2016 00:28 IST

विनाअनुदानित शाळांचे प्रश्न : आंदोलनाचा दहावा दिवस; पंचगंगा घाटावर अभिनव आंदोलन

कोल्हापूर : राज्यातील अनुदानपात्र शाळांना त्वरित अनुदान द्यावे, या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाचा निषेध विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांनी शुक्रवारी प्रतीकात्मक दशविधी घालून केला. शुक्रवारी आंदोलनाच्या दहाव्या दिवशी पंचगंगा नदीघाटावर त्यांनी हे अभिनव आंदोलन केले.अनुदानपात्र ठरलेल्या शाळा व वर्गतुकड्यांना शासनाकडून त्वरित वेतन व अनुदान मिळावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि राज्यमान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या नेतृत्वाखाली शिक्षकांचे शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आमरण उपोषण व बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. शिक्षकांच्या या आंदोलनाची सुरुवात होऊन नऊ दिवस उलटले तरी, शासन हे अनुदान देण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने शिक्षकांनी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास पंचगंगा नदीघाटावर प्रतीकात्मक दशविधी घालून शासनाचा निषेध केला. यावेळी आंदोलनकर्त्या काही शिक्षकांनी मुंडणदेखील केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे, गजानन काटकर, प्रकाश पाटील, शिवाजी खापणे, बबनराव पेटकर, एम. के. पवार, राजू भोरे, अर्जुन पवार, मोहन पिसाळ, संभाजी आडूरकर, शिवाजी गायकवाड, विशाल देसाई, महासंघाचे संतोष आयरे, राजेंद्र कोरे, यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यावर आज मोर्चाअनुदान देण्याबाबतचा शासकीय आदेश दोन दिवसांत काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी ७ जूनला जाहीर केले होते. मात्र, त्याची अद्याप कार्यवाही झाली नसल्याने शासनाच्या निषेधार्थ आम्ही शुक्रवारी दशविधी केल्याचे कृती समितीचे राज्याध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. ते म्हणाले, औरंगाबाद येथील उपोषणकर्ते शिक्षक गजानन खरात यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याप्रकरणी शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी आज, शनिवारी दुपारी एक वाजता लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापुरातील उपोषणकर्त्या शिक्षकांची प्रकृती खालावली आहे. शासनाने लवकरात लवकर अनुदान मान्यतेचा शासकीय आदेश न काढल्यास आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविणार असल्याचे जगदाळे यांनी यावेळी सांगितले.