शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिक्षक बँक संचालकांवर ‘८८’ची कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:47 IST

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सहकार ‘कलम ८८’नुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी दिले. हातकणंगलेचे उपनिबंधक मनोहर माळी यांना जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत केले असून बँकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४७ लाख ४६ हजार रुपयांचे केलेले नुकसान वसुलीची प्रक्रिया सुरू झाल्याने ...

ठळक मुद्दे मनोहर माळी यांची नियुक्ती : ४८ लाख नुकसानीची जबाबदारी निश्चित होणार; ‘गुरुजीं’चे धाबे दणाणलेजिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी चौकशी करून संचालकांवर जबाबदारी निश्चितीचे आदेश करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे यांना प्राधीकृत करण्यात आले.

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची सहकार ‘कलम ८८’नुसार चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी शुक्रवारी दिले. हातकणंगलेचे उपनिबंधक मनोहर माळी यांना जबाबदारी निश्चितीसाठी प्राधिकृत केले असून बँकेच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात ४७ लाख ४६ हजार रुपयांचे केलेले नुकसान वसुलीची प्रक्रिया सुरू झाल्याने ‘गुरुजीं’चे धाबे दणाणले आहे.

शिक्षक बँकेने चुकीच्या पद्धतीने कामकाज केल्याने रिझर्व्ह बँकेने दोनवेळा आर्थिक दंड केला. लेखापरीक्षकांना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील तपासणीत ठपके ठेवले होते. त्यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे पुढील कारवाईबाबत अहवाल सादर केला होता. त्यानुसार आॅक्टोबर २०१६ मध्ये बँकेची ‘कलम ८३’नुसार चौकशी करण्यासाठी करवीरचे सहायक निबंधक सुनील धायगुडे यांना प्राधीकृत करण्यात आले. त्यांनी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या कामकाजातील प्रमुख चौदा मुद्द्यांची सखोल चौकशी केली. त्यामध्ये एकरकमी परतफेडी योजनेतंर्गत संचालकांनी सहा खातेदारांना नियमबाह्य २ लाख २२ हजार ४३० रुपयांची विशेष सवलत दिल्याचे स्पष्ट झाले.

बँकेच्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात ४९ लाख १४ हजार ९१९ रुपये नफा झाल्याचा दिसतो, पण त्यावर २ टक्क्यांप्रमाणे ३५ लाख २३ हजार ५८८ रुपये सभासदांना लाभांश वाटप केला आहे. बँकिंग रेग्युलेशन अ‍ॅक्ट १९४९, ‘कलम ३५’ नुसार रिझर्व्ह बँकेच्या तपासणीत पूर्वपरवानगीशिवाय लाभांश वाटप केल्याने दहा लाखांचा दंड केला. ४७ लाख ४६ हजारांचे नुकसान केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते. हा अहवाल सुनील धायगुडे यांनी जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांच्याकडे दिला. यानुसार जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी चौकशी करून संचालकांवर जबाबदारी निश्चितीचे आदेश शुक्रवारी दिले.‘८३’च्या चौकशीतील ठपकेएन.पी.ए. तरतूद, व्याजाची चुकीची केलेली तरतूद, आयकर कायद्याप्रमाणे झीज आकारणी नाही, आॅडिट फीची तरतूद, निवडणूक खर्च, मुदत संपलेल्या ठेवींवर देणे व्याज तरतूद.यांच्यावर होणार जबाबदारी निश्चितीराजाराम वरूटे, वसंत जोशिलकर, रवीकुमार पाटील, सुभाष निकम, रघुनाथ खोत, पांडुरंग केणे, बळवंत पाटील, रावसाहेब देसाई, राजमोहन पाटील, दगडू पाटील, रामचंद्र मोहिते, वसंत जाधव, उत्तम सुतार, शंकर भोई, सुरेश कांबळे, रंजना माळी, कावेरी चव्हाण, रत्नमाला खेमाजी, बाळासो पाटील, सुधाकर शिवुडकर, बजरंग लगारे, नामदेव रेपे, आण्णासो शिरगांवे, गणपती पाटील, संभाजी बापट, साहेब शेख, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, प्रसाद पाटील, अरुण पाटील, धोंडिराम पाटील, प्रशांतकुमार पोतदार, सुरेश कोळी, बाजीराव कांबळे, स्मिता डिग्रजे, लक्ष्मी पाटील. अधिकारी - आनंदराव शिंदे (सीईओ), मोहन भारते (सीईओ), मधुकर भालकर (अकौंटट), दिलीप खराडे (अकौटंट).चार महिन्यांनंतर ‘८८’ची कारवाईसुनील धायगुडे यांनी ‘८३’चा अहवाल मार्च महिन्यात जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता. त्यानंतर ‘कलम ८८’ नुसार जबाबदारी निश्चितीची कारवाई करण्यासाठी४ महिन्यांचा कालावधी लोटला.एकरकमी परतफेड नियमबाह्य सूट -२ लाख २२ हजार ४३०नियमबाह्य लाभांश वाटप -३५ लाख २३ हजार ५८८लाभांश वाटपावर झालेला दंड - १० लाख