शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

शिक्षकांच्या उत्तरांनी उपस्थितांची मती गुंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:30 IST

कोल्हापूर : एकीकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘वशिल्याने शिक्षकांनी पुरस्कार ...

कोल्हापूर : एकीकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘वशिल्याने शिक्षकांनी पुरस्कार मिळवू नयेत’ असे आवाहन केले असताना दुसरीकडे त्यांच्याच नेतृत्वाखाली कारभार सुरू असलेल्या जिल्हा परिषदेत मात्र ज्यांना साध्या साध्या प्रश्नांची उत्तरे देता आलेली नाहीत, अशा शिक्षकांना सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे पुरस्कार देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेने पुरस्कार द्यावेत; मात्र किमान ते मान्यवरांच्या नावे तरी देऊ नयेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेचे पुरस्कार नेहमी चर्चेत असतात. शाहू पुरस्कारापासून ते आदर्श शिक्षक पुरस्कारापर्यंत अनेकवेळा ही बाब अधोरेखित झाली आहे. ३ सप्टेंबर २०२१ रोजी शिक्षक पुरस्कारांसाठी दिवसभर राजर्षी शाहू सभागृहात मुलाखती घेण्यात आल्या. दिवसभर पदाधिकारी आणि प्रमुख अधिकारी या मुलाखतींसाठी उपस्थित होते. परंतु यावेळी शिक्षकांनी दिलेल्या काही उत्तरांनी उपस्थितांना डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ आली.

यातील काही प्रश्नांची झलक खालीलप्रमाणे...

प्रश्न... महाराणी ताराराणी कोण होत्या?

उत्तर .. त्यांनी शिक्षण क्षेत्रात चांगले कार्य केले. त्यांच्या नावे अनेक शिक्षण संस्था आहेत.

प्रश्न.. मती म्हणजे काय?

उत्तर .. मती म्हणजे चारित्र्य.

प्रश्न... मग मतिमंद कोणाला म्हणायचे?

निरुत्तर

प्रश्न .. डॉ. जे. पी. नाईक कोण होते?

निरुत्तर

अशा पद्धतीने काही साधे साधे प्रश्न यावेळी विचारण्यात आले. ज्यांची उत्तरे मुलाखतकर्त्यांना देता आलेली नाहीत. मात्र, यातील काहींना पुरस्कार मात्र देण्यात आला आहे. तालुका, मतदारसंघ, गट, तट, आगामी निवडणुका, शिक्षक संघ, समिती असा सगळा हिशोब घालून, मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, सदस्य या सर्वांच्या शिफारशींचा विचार करून पुरस्कार दिले जातात हे सर्वज्ञात आहे. परंतु केवळ याच जोरावर जर पुरस्कार मिळायला लागला तर, मात्र या पुरस्कारांचे अवमूल्यन झाल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

चौकट

बारा पानी पुस्तक

शिक्षकांनी पुस्तक लिहिले असेल तर त्यासाठी दोन गुण ठेवण्यात आले आहेत. तर एका बहाद्दराने बारा पानी पुस्तक प्रकाशित झाल्याचे यावेळी सांगितले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संकलित केलेली माहिती बारा पानांमध्ये बसवून हे पुस्तक लिहिल्याचे दाखवून त्याचेही दोन गुण मिळवण्यात आले.

चौकट

पुरस्कार रद्द करण्याची आरपीआयची मागणी

गैरव्यवहाराची लागण झालेले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार रद्द करावेत, अशी मागणी आरपीआय आठवले गटाचे सतीश माळगे यांनी केली आहे. गावात न राहणारे, तालुक्याला काम आहे म्हणून फिरणाऱ्यांनाही पुरस्कार देण्यात आले आहे, असा आरोप यातून करण्यात आला आहे. तालुक्याला पाहिजे तेवढे गुण देऊन हे पुरस्कार निश्चित केल्याचेही निवेदनात म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांच्याकडे हे निवदेन देण्यात आले आहे. या वेळी किरण माने, कुंडलिक कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.