शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

‘टी.सी.’साठी विद्यार्थ्याचा शिवाजी विद्यापीठात गोंधळ

By admin | Updated: August 28, 2015 00:05 IST

सुरक्षारक्षक जखमी : डीयुडीसी कक्षाच्या दरवाजाची काच फोडली

कोल्हापूर : महाविद्यालय सोडल्याचा दाखला (ट्रान्स्फर सर्टिफिकेट-टी. सी.) मिळत नसल्याच्या कारणावरून शिवाजी पेठ परिसरातील एका कॉलेजमधील विद्यार्थ्याने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागात गुरुवारी दुपारी गोंधळ घातला. तसेच राग अनावर झाल्याने त्याने डिजिटल युनिव्हर्सिटी डिजिटल कॉलेज (डीयूडीसी) या कक्षाच्या प्रवेशद्वाराची काच लाथ घालून फोडली. यात विद्यापीठाचा सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाला. संबंधित विद्यार्थ्याच्या कृत्याची विद्यापीठ वर्तुळात दिवसभर जोरदार चर्चा सुरू होती.बी. कॉम.च्या द्वितीय वर्षात शिकणारा संबंधित विद्यार्थी टी. सी. मिळविण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास विद्यापीठाच्या परीक्षा भवन एकमध्ये आला. त्याने भवनच्या पहिल्या मजल्यावरील ‘डीयूडीसी’चा कक्ष गाठला. शिवाय कक्षात असलेले उपकुलसचिव जी. आर. पळसे यांना भेटण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी परीक्षाविषयक गोपनीय कामकाज चालत असल्याने विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक मोहन पाटील यांनी त्याला कक्षाच्या प्रवेशद्वारात रोखले. शिवाय उपकुलसचिव पळसे हे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असलेल्या खिडकीतून तुझ्याशी बोलतील, असे सांगितले. यावर संबंधित विद्यार्थ्याने त्यांना बाहेर बोलवा, नाही तर मला आत सोडा, अशी आक्रमक भूमिका घेतली. सुरक्षेचा प्रश्न असल्याने सुरक्षा रक्षक पाटील यांनी त्याला आत सोडले नाही. त्यावर रागाच्या भरात संबंधित विद्यार्थ्याने कक्षाच्या दरवाजावर लाथ मारली. यात दरवाजाची काच फुटली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे या ठिकाणी निकालातील दुरुस्ती तसेच अन्य कामकाजासाठी आलेले विद्यार्थी, पालकांचा गोंधळ उडाला. तसेच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरवाजावर लाथ मारून पळून निघालेल्या संबंधित विद्यार्थ्याला सुरक्षा रक्षक व परीक्षा विभागातील कर्मचाऱ्यांनी पकडले. तसेच त्याला परीक्षा नियंत्रकांच्या कक्षात बसवून ठेवले. विद्यापीठ कायदा आणि नियमानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)जबाबदारी झटकण्याचा परिणामपरीक्षा अर्ज जनरेट होत नाही, जा विद्यापीठात; इ-फॉरमॅटमधील टी. सी. मिळत नाही, जा विद्यापीठात; असा सल्ला सध्या विद्यापीठ कार्यक्षेत्रातील काही महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना दिला जात आहे. आपल्यावरील जबाबदारी झटकून काही महाविद्यालये विद्यार्थ्यांना पुढे करतात. महाविद्यालयांच्या या जबाबदारी झटकण्याचा परिणाम संबंधित विद्यार्थ्याच्या गोंधळ घालण्याच्या क्रियेतून स्पष्ट झाला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पुढे करून जबाबदारी झटकणाऱ्या महाविद्यालयांना वेळीच सूचना देण्याची कार्यवाही विद्यापीठाने करण्याची अपेक्षा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी व्यकत केली.