शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

‘तासगाव’साठी निविदाच नाही !

By admin | Updated: June 13, 2015 00:50 IST

सभासद-कामगारांची निराशा : राज्य बॅँक जाचक अटींवर ठाम

भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना एक वर्षासाठी भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी राज्य बॅँकेने काढलेल्या निविदेकडे इच्छुकांनी पाठ फिरविल्याचे शुक्रवारी अखेरच्या दिवशी स्पष्ट झाले. कारखाना विक्रीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयातील याचिकेचा निकाल लागेपर्यंत बॅँक धोरणात कोणताही बदल करणार नसल्याचे बॅँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड यांनी सांगितले. त्यामुळे येत्या हंगामात कारखाना सुरू होण्याची आशा मावळली आहे. कारखान्यावर मालकी हक्क सांगणारा गणपती संघ या प्रक्रियेपासून चार हात दूरच राहिला आहे.तूरची (ता. तासगाव) येथील तासगाव कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी राज्य सहकारी बॅँकेने निविदा जाहीर केली होती. त्यावर मुंबईच्या श्रीराज डेव्हलपर्स या संस्थेने कारखाना चालविण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखवीत कोरी निविदा खरेदी केली होती. मात्र, निविदेमध्ये असणाऱ्या जाचक अटी शिथिल केल्या तरच कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले होते. श्रीराज डेव्हलपर्सचे मालक प्रमोद पाटील यांनी कारखान्याची पाहणी केली होती. यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीचा खर्च भाडेपट्ट्यातून वजा करावा, तसेच गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन शंभर रुपयांप्रमाणे भाडे आकारावे, अशी मागणी त्यांनी केली होती. कोट्यवधीच्या गुंतवणुकीचा विचार करता कारखाना दीर्घ मुदतीने चालविण्यास द्यावा, अशीही त्यांची मागणी होती. मात्र, राज्य बँकेने ताठर भूमिका घेतल्याने त्यांनी निविदाच दाखल केली नाही. शुक्रवारी निविदेकडे सर्वांनीच पाठ फिरविल्याचे स्पष्ट झाले. (वार्ताहर)न‘सोनहिरा’चाही बॅँकेशी पत्रव्यवहारकारखाना चालविण्यास घेण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या सोनहिरा सहकारी साखर कारखाना प्रशासनाने शुक्रवारी राज्य बॅँकेशी लेखी पत्रव्यवहार करून जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. एका गळीत हंगामासाठी किमान अडीच कोटी रुपये भाडे व प्रत्यक्ष गाळपानुसार प्रतिटन भाडे देण्यासाठी किंवा शासनाने ठरवून दिलेले भाडे देण्यास तयार असल्याचे ‘सोनहिरा’चे म्हणणे आहे. बॅँकेने या प्रस्तावास मान्यता दिल्यास तीन दिवसांत एक कोटीची बयाणा रक्कम भरण्यास तयार असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. गेल्यावर्षी ‘सोनहिरा’ने भरलेली २५ लाखांची बयाणा रक्कम राज्य बॅँकेने परत के ली नव्हती. यंदा तर निविदेची बयाणा रक्कम एक कोटी असून, पूर्वाश्रमीचा अनुभव लक्षात घेता निविदा भरण्याचे धाडस भल्याभल्या संस्थांनीही केले नाही.प्रशासक मंडळ धोरणांवर ठामतासगाव कारखान्याबाबतचे प्रकरण जोपर्यंत न्यायप्रविष्ट आहे, तोपर्यंत आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. व्ही. के. अगरवाल हे बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष, जे. एस. सहानी सचिव, तर प्रमोद कर्नाड व्यवस्थापकीय संचालक आहेत. या तिघांच्या प्रशासकीय मंडळाने ठरविलेल्या धोरणानुसार कारखाना फक्त एकाच गळीत हंगामासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, कोणत्याही अटी शिथिल करणार नसल्याची भूमिका कर्नाड यांनी मांडली.बॅँकेने फेरविचार करावाकारखाना दुरुस्तीसाठीचा खर्च अंदाजे पाच ते सहा कोटी असून, वर्षभराचे किमान भाडे ६ कोटी ५० लाख रुपये होते. कारखाना सुरू करायचाच असेल तर राज्य बॅँकेने पुन्हा एकदा सोनहिरा साखर कारखान्याच्या प्रस्तावावर विचार करावा, अशी मागणी तासगाव कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.