शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

‘तंटामुक्ती’मुळे पोलिसांवरील ताण कमी

By admin | Updated: January 8, 2015 00:02 IST

एस. चैतन्य : हेरवाड ग्रामपंचायतीस तंटामुक्तीचा धनादेश प्रदान

कुरुंदवाड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावागावांतील तंटे मिटत असल्याने पोलीस, न्यायालयावरील ताण कमी झाला आहे. समितीने तंटामुक्ती मोहीम बक्षिसापुरते मर्यादित न ठेवता निरंतन चालू ठेवल्यास गावचा व पर्यायाने देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे, असे प्रतिपादन इचलकरंजी विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.हेरवाड (ता. शिरोळ) गावाला तंटामुक्तीबद्दल शासनाचा धनादेश वाटपप्रसंगी येथील ग्रामपंचायतीसमोर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकला पाटील होत्या. प्रारंभी एस. चैतन्य यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्तीचा आठ लाख ७५ हजारांचा बक्षिसाचा धनादेश व प्रशस्तिपत्र समिती अध्यक्ष सत्याप्पा बरगाले व सरपंच पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.यावेळी सरपंच पाटील म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षांपासून सर्व सदस्यांसह ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करीत असल्याने गावचा विकास होत आहे. तंटामुक्तीबरोबरच गावाने व्यसनमुक्तीची मोहीमही हाती घेतली असून, तंटामुक्तीच्या बक्षिसाचा विनियोग योग्यरितीने केला जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला. पोलीस उपअधीक्षक दिलीप सोनवणे, तंटामुक्त अध्यक्ष सत्याप्पा बरगाले, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, पं. स. सदस्या सुवर्णा अपराज, अ‍ॅड. देवराज मगदूम यांची भाषणे झाली. यावेळी उपसरपंच जीवन कांबळे, दिलीप पाटील, गुलाब विजापुरे, बंडू पाटील, वैभव पाटील, रामगोंडा पाटील, राजू आलासे, प्रदीप पाटील, प्यारेलाल मकानदार, शंकर बरगाले, जयगोंडा पाटील, पिंटू हुक्कीरे, बाळाप्पा माळी, रावसाहेब पाटील, आदी उपस्थित होते. दामोदर सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर ग्रामसेवक निर्मळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)