शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त समितीची मोहीम उरली केवळ नावापुरतीच : खटाव तालुक्यातील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:34 IST

औंध : गावागावांतील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला प्रारंभी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त मोहीम थंडावली आहे.गावातील तंटामुक्त समित्या ...

ठळक मुद्देशासनाकडून ऊर्जितावस्था देण्याची गरज

औंध : गावागावांतील तंटे गावातच मिटवावेत, गावोगावी शांतता नांदावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली. त्यानुसार प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या मोहिमेला प्रारंभी उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला. परंतु गेल्या दोन ते तीन वर्षांपासून खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त मोहीम थंडावली आहे.

गावातील तंटामुक्त समित्या केवळ कागदांवरच राहिल्या असल्याने तंट्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे तंटामुक्तीची चळवळ गतिमान करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध कारणांवरून निर्माण होणारे तंटे वेळीच मिटवले नाहीत तर ते मोठे स्वरूप धारण करतात. गावागावांत शांतता नांदावी, यासाठी दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी २००६ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली.

ग्रामीण भागात सुरू केलेली मोहीम यशस्वीरीत्या सुरू झाल्यानंतर काही वर्षे प्रभावीपणे राबविण्यात आली.अनेक गावांमध्ये घराच्या, शेतीच्या हद्दीवरून तसेच वादावादीच्या प्रकारातून तसेच क्षुल्लक कारणांवरून भांडणे, तंटे मोठ्या प्रमाणात निर्माण होतात, राजकीय हेवेदावे, गैरसमजुतीतून होणारी ही भांडणे पोलीस प्रशासन तसेच नंतर न्यायालयीन कचाट्यात अडकतात, यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, मानसिक त्रास, वेळेचा अपव्यय संबंधितवादी प्रतिवादींना सहन करावे लागतात, यासाठी तंटामुक्त समिती संकल्पना मागील सात-आठ वर्षांत प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र त्यानंतर या समित्या कागदावरच राहिल्या असून, अनेक गावांमध्ये त्या आहेत का नाहीत, हेसुद्धा समजत नाही. त्यामुळे तंटामुक्त मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने या समित्यांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे बनले आहे.क्षुल्लक तक्रारी पोलीस ठाण्यात दाखलतंटामुक्त मोहिमेंतर्गत मागील काही वर्षांत गावातील तक्रारींचे निवारण समिती करीत होती. त्यामुळे तक्रादारांचा वेळ व पैशाची बचत होत होती. गावातच तंटे मिटल्याने तक्रारदारांची पुन्हा गुण्यागोविंदाने वाटचाल सुरू असायची; परंतु गेल्या काही दिवसांत क्षुल्लक कारणावरून देखील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होत आहेत.ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घ्यावा...तंटामुक्त समितीला शासनाने बळ देण्याची गरज असून, कमीतकमी तंटे झाल्यास गावागावात शांतता प्रस्थापित होईल, तसेच पूर्वीचे तंटामुक्त गाव पुरस्काराचे स्वरूप व्यापक करून वॉटरकप स्पर्धेसारखी तंटामुक्त गाव स्पर्धा लावणे गरजेचे बनले आहे. तथापि जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, समितीच्या कामकाजात अडथळा निर्माण करीत असतील, अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ आॅगस्टनंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.तंटे मिटविण्यास सहकार्य करावे...सद्य:स्थितीत प्रत्येक गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष बदलण्याची ग्रामसभेला आवश्यकता वाटत असेल तर अध्यक्ष बदलून नवीन अध्यक्षाची निवड करावी, अन्यथा तोच कायम ठेवावा, या समितीमध्ये महिलांना ३० टक्के प्राधान्य द्यावे. तंटामुक्त गाव समित्यांनी गावातले तंटे गावातच मिटवत राहावे. महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी गावभेटी व दौऱ्याचे वेळी तंटामुक्त गाव समित्यांना मार्गदर्शन करून तंटे मिटविण्यास सहकार्य करावे.