शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जलयुक्त शिवारसाठी तालुकास्तरीय समिती

By admin | Updated: April 13, 2016 00:14 IST

‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ : राज्य शासनाचा २०१९ पर्यंत पाणीटंचाईमुक्तचा निर्धार

भरत शास्त्री -- बाहुबली --दुष्काळामुळे राज्यात पाण्याची स्थिती गंभीर बनली आहे. त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शासनाने जलयुक्त शिवार योजनेतून ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यामध्ये २०१९ पर्यंत पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्यासाठी स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर समन्वय व आढावा समिती स्थापन करण्यात येणार आहे.यापूर्वी जिल्हास्तरावर अशा प्रकारची समिती स्थापन केली होती; परंतु कामाची व्याप्ती व स्थानिक पातळीवरील समस्यांचा विचार करून जिल्हास्तराऐवजी तालुकास्तरावर या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमुळे सर्वच शासकीय यंत्रणा कार्यशील होणार आहेत. पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने राज्यात अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जलयुक्त शिवारअंतर्गत बंधारे बांधले जाणार आहेत. बंधारे बांधण्यात येणाऱ्या जमिनी महसूल विभागासह वनविभागाच्या अखत्यारीतल्या असतात. त्यामुळे प्रत्येक विभागांची परवानगी घेणे सोपे होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रथम डिसेंबरमध्ये जिल्हास्तरीय समितीची स्थापना केली ; परंतु त्याची अव्यवहार्यता अभ्यासून सध्या तालुकास्तरीय आढावा समितीची स्थापना शासनाने करण्याचे निर्देश दिले आहेत.या समितीमध्ये स्थानिक विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. समितीचे उपाध्यक्ष प्रांताधिकारी, तर सचिव तहसीलदार असणार आहेत. पंचायत समितीचे सभापती, गटविकास अधिकारी, उपजिल्हा कृषी अधिकारी व विविध विभागातील अधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. उपाययोजनेत जलयुक्त शिवार समिती सक्रिय सहभागी असणार आहे.