शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तलेसराप्रकरणी चर्चा फक्त आकडेवारीचीच

By admin | Updated: May 8, 2017 01:06 IST

तलेसराप्रकरणी चर्चा फक्त आकडेवारीचीच

राजाराम पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : तलेसरा दिवाळखोरीप्रकरणी दररोज नवनवीन माहिती समोर येत असली तरी प्रत्यक्षात हाती काहीच लागत नसल्याने पॉपलीन यंत्रमाग कारखानदार हवालदिल झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांत ११८ तक्रारी दाखल होऊन त्यामध्ये २६.७२ कोटी रुपयांची येणेबाकी आहे, तर यंत्रमाग कारखानदारांच्या खाणेसुमारीनुसार विविध प्रकारच्या ४९८ प्रकारांत ३०.२७ कोटी रुपये देय रक्कम आहे. अशा प्रकारे कोट्यवधी रुपये असूनसुद्धा या प्रकरणास तीन आठवडे उलटले तरी आकड्यांच्या ताळमेळाशिवाय प्रत्यक्षात हातात काहीच नाही, अशी विचित्र स्थिती आहे.येथील जी. तलेसरा या कापड पेढीकडून पॉपलीन या प्रकाराचे कापड विकत घेऊन ते बालोत्रा - राजस्थान येथे पाठविले जात असे. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ सदरची व्यापारी पेढी इचलकरंजीतील कापड बाजारात कार्यरत होती.शहरात व विटा (जि. सांगली) येथे तयार होणाऱ्या पॉपलीन कापडापैकी सुमारे साठ टक्के कापड या पेढीकडून खरेदी केले जात असे. त्यामुळे पेढीचा एकूण खरेदी-विक्रीचा आवाकासुद्धा मोठा होता. दररोज सव्वा कोटी रुपयांचे पेमेंट या पेढीकडून केले जात असे, असे सांगण्यात येते.अशा या कापड पेढीकडून देण्यात येणारे धनादेश एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात न वटता परत येऊ लागल्याने पॉपलीन कापड उत्पादक यंत्रमागधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली. तलेसरा कापड व्यापारी पेढीचे प्रमुख गौतमकुमार तलेसरा यांचे फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलांकडून या पेढीचे व्यवहार पुढे चालू ठेवले होते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पेढीवरील व्यवहार सुरळीतपणे सुरू होते. मात्र, त्यानंतर पेढीने दिलेले धनादेश बॅँकेतून परत येऊ लागल्यामुळे या पेढीला कापड देणाऱ्या यंत्रमागधारकांबरोबर काही कापड व्यापारीसुद्धा हबकून गेले.तलेसरा कापड पेढीला कापड देणारे यंत्रमागधारक एकत्रित येऊ लागले. चौकशी केली असता तलेसरा हे इचलकरंजीतून बेपत्ता झाल्याचे समजले. काही बड्या यंत्रमागधारकांचे कोट्यवधी रुपयांचे पेमेंट अडकल्यामुळे हे यंत्रमागधारक तलेसरा यांच्या मूळ गावी बालोत्रा येथे गेले, तेथे शोधाशोध केली. मात्र, या प्रकारात तलेसरा यांचे मामा व काका हेच या यंत्रमागधारकांना सामोरे गेले. तेथे यंत्रमागधारकांच्या येण्या-जाण्याविषयी खातरजमा करण्याचे काम आठवडाभर चालले. दरम्यानच्या काळात खासदार राजू शेट्टी व आमदार सुरेश हाळवणकर यांनी यंत्रमागधारकांची रक्कम परत मिळावी, म्हणून आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले. आठवडाभर बालोत्रा येथे गेलेल्या यंत्रमागधारकांना मात्र हातात काहीच मिळाले नाही. म्हणून ते इचलकरंजीला परतले. दरम्यान, इचलकरंजी पोलिसांकडे ११८ तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये २६.७२ कोटी रुपयांच्या कापडाचे पेमेंट मिळाले नाही, असे यंत्रमागधारकांनी नमूद केले. आता इचलकरंजीतील यंत्रमागधारक एकत्रित आले असून, त्यांनी या प्रकरणात अडकलेल्या यंत्रमागधारकांची यादी तयार केली आहे.त्यामध्ये यंत्रमागधारकांच्या एकत्रित ताळमेळानुसार ४९८ प्रकारामध्ये ३०.२७ कोटी रुपयांची रक्कम तलेसरा यांच्याकडून येणे असल्याचे नमूद केले आहे. अशा प्रकारे तलेसरा प्रकरण उदयास येऊन तीन आठवडे लोटले तरी यंत्रमागधारकांची यादी काढणे आणि येण्या-देण्याचा ताळमेळ घालणे या पलीकडे प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही. अशा तऱ्हेची विचित्र कोंडी यंत्रमागधारकांची झाली आहे. नुकसानीच्या गूढ प्रश्नांची चर्चायंत्रमागधारकांकडून कापड विकत घेऊन त्याची पाली-बालोत्रा येथे विक्री करण्यासाठी अडत व्यापाऱ्यांकडून ठरावीक दलाली घेतली जाते. अडत व्यापारी कोट्यवधी रुपयांचा कापड माल विकत घेतात आणि ते कापड राजस्थानला पाठविले जाते. असे होत असले तरी अडत व्यापारी हा फक्त दलालीचा मालक असल्यामुळे तलेसरा प्रकरणात नुकसान कसे झाले? आणि दिवाळखोरीचा प्रकार कसा घडला ? याच गूढ प्रश्नांची चर्चा येथील कापड बाजारात आहे.