शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
2
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
3
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
4
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
5
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
6
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
7
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
8
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
9
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
11
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली
12
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
13
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
14
"हा शिक्षक नाही राक्षस आहे"; नापास करायची भीती दाखवून शाळेत २३ मुलांचे लैंगिक शोषण, व्हिडिओ बनवले
15
What Is Option Trading: किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
16
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
17
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
18
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
19
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
20
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

कारवाईचे बोला, अन्यथा कोंडून घालू

By admin | Updated: March 20, 2015 23:41 IST

पंचगंगा प्रदूषण प्रश्न : बैठकीत इशारा, कारवाईवर सकारात्मक चर्चा, अधिकारी धारेवर

कोल्हापूूर : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर काय कारवाई करणार ते बोला, खुलासा नको, अन्यथा कुलूप आणले आहे. तुम्हाला कोंडून घालू, असा इशारा शुक्रवारी स्वाभिमानी युवा आघाडी व पर्यावणप्रेमींनी दिला. त्यानंतर पुढील बैठकीत कारवाईचा अहवाल दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना व दोषींवर कारवाई यासंबंधी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अधिकारी गैरहजर होते. त्यावर सुरुवातीला जोरदार आक्षेप घेतला. प्रदूषणासंबंधित जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नसेल तर बैठक का आयोजित केली, असा प्रश्न ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सर्वच विभागाचे सक्षम अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत बैठक सुरू होणार नाही, असा पवित्रा साऱ्यांनीच घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी मोबाईलवरून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. बैठकीला सुरुवात झाली. ‘स्वाभिमानी’चे युवा अध्यक्ष बंडू पाटील यांनी व्यासपीठावर बसलेले सर्वच प्रदूषणाला दोषी असून, चोर आहेत, असा थेट आरोप केला. पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई काय करणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी लावून धरली. त्याला साऱ्यांनी पाठिंबा दिला. पंचतारांकित वसाहतीतील दूषित पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित होत असल्याचे बंडू पाटील, संदीप बुधवले यांनी निदर्शनास आणून दिले. औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी के. एस. भांडेकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेचे विजय देवणे यांनी आधी माहिती घ्या आणि नंतर बोला, अशी समज दिली. ते म्हणाले, भोगावती, कुंभी, दालमिया, रेणुका, राजाराम हे साखर कारखाने मळीमिश्रीत पाणी नदीत सोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. कुठे आहेत जिल्हाधिकारी ?‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. प्रदूषणावर १५ वर्षांपासून लढत आहे. उच्च न्यायालयात गेलो आहे. अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बैठकीला गैरहजर राहणारे जिल्हाधिकारी कुठे आहेत, असा सवाल दिलीप देसाई यांनी केला. न्यायालयाचा अवमानइचलकरंजी नगरपालिकेने प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयातील सुनावणीत दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत नाही, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. शुक्रवारी सकाळी थेट दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याची क्लीप माझ्याकडे आहे. त्यामुळे इचलकरंजी मुख्याधिकाऱ्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे, असा आरोप बंडू पाटील यांनी केला. इचलकरंजीतील प्रदूषित कारखान्यांचा सर्व्हे होणार बैठकीत निर्णय : ‘प्रदूषण’, नगरपालिका, ‘औद्योगिक’ संयुक्त मोहीम राबवणारकोल्हापूर : इचलकरंजी शहरातील कपड्यांवर विविध प्र्रकारे प्रक्रिया करणारे उद्योग किती आहेत. कोणत्या उद्योगांकडून प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडले जाते यांचा सर्व्हे तीन ते चार दिवसांत प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, नगरपालिका, वीजवितरण कंपनी यांनी संयुक्तपणे करण्याचा निर्णय झाला. पाटबंधारे विभागाने नदीकाठावरील शेतकऱ्यांची पाणीपट्टी पाटबंधारे विभागाने मागू नये, आम्ही देणार नाही. पावसाळ्यात पुराचा आणि उन्हाळ््यात प्रदूषित पाण्याची समस्या शिरोळ तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे शिरोळ तालुका आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करा, असे बंडू पाटील यांनी मागणी केली. मुख्याधिकारी पवार यांनी प्रदूषण करणारे निदर्शनास आल्यास कारवाई केली जात आहे. साईदीप इंडस्ट्रीजचे दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याची माहिती घेतो, असे सांगितले. डोके म्हणाले, सायझिंग व अन्य उद्योग यांचा सर्व्हे करण्यासाठी मोहीम राबविली जाईल. प्रांताधिकारी पाटील म्हणाले, उद्योग चालवून कोणीही उपकार करत नाहीत. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी. ...तर ‘एव्हीएच’सारखी अवस्था होईलप्रदूषणकारी घटक बाहेर सोडणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना परवाना देऊ नये. क्षमतेपेक्षा अधिक गाळप केल्यानंतर बाहेर पडणारे दूषित पाणी नदीत किंवा ओढ्यावर कारखाने सोडत असतात. त्यामुळे गाळप परवाना देतानाच प्रक्रिया प्रकल्प सक्षम आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा आता लोक शांत बसणार नाहीत. ‘एव्हीएच’सारखी अवस्था करतील, असा इशारा गायकवाड यांनी दिला.