शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

तळेगाव ठाकुरात ‘बाटली झाली आडवी’

By admin | Updated: June 15, 2017 00:07 IST

तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोगावती : राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत हात या चिन्हावर निवडणूक लढवावी. काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत करू आणि त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे आग्रहाचे निमंत्रण जिल्हा काँग्रेसचे व भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आमदार आबिटकर यांना दिले.कौलव (ता. राधानगरी) येथे स्व. बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या २६व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. यावेळी भोगावती कारखान्याच्या सर्व संचालकांचा, नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आबिटकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री स्वत:हून काही न बोलता चंद्रकांत पाटील यांच्याकडून बोलवून घेत आहेत. कर्जमाफी देत असताना सरसकट देणे, तत्त्वत: देणे अशी वर्गवारी करून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. स्व. बाळासाहेब पाटील कौलवकर यांना स्व. यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय सामाजिक वारसा लाभला होता. त्याच तत्त्वाचे राजकारण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले. आमदार आबिटकर यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आवाज विधानसभेत उठवला तसेच मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून सरसकट कर्जमाफीची मागणी केली. आपल्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांनी एक होण्याची गरज आहे. स्व. बाळासाहेब पाटील यांचे विचार आजच्या राजकारणाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. कारखाना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, रविश पाटील कौलवकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्व. बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या फोटोचे पूजन पी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा, कृषी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा बाळासाहेब पाटील-कौलवकर स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, कृष्णराव किरुळकर, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयनी साळोखे, विजयसिंह मोरे, अरुण जाधव, अभिजित तायशेटे, संजयसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, एम. आर. पाटील, माणिकराव चव्हाण, जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कौलव येथे स्व. बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या २६ व्या स्मृतीदिनानिमित्त सत्कार आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात माजी आमदार पी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृष्णराव किरुळकर, आमदार प्रकाश आबिटकर, अरुण डोंगळे, उदयसिंह पाटील, आदी उपस्थित होते.