शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

राज्यात लवकरच तलाठी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 01:14 IST

गारगोटी : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास संपवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत असून, त्यातील एक भाग म्हणून राज्यात सजांची व मंडल अधिकाºयांची कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे चंद्रकांतदादा पाटील : गंगापूर येथे चावडी इमारतीचे उद्घाटनतलाठी कार्यालय लवकरात लवकर उभारणी करण्याचा मानसकाही ठिकाणी तलाठी कार्यालये भाड्याच्या खोलीत

गारगोटी : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास संपवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत असून, त्यातील एक भाग म्हणून राज्यात सजांची व मंडल अधिकाºयांची कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे संगणकीकृत सात-बारे उतारे शेतकºयांना त्वरित मिळतील. तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी चार हजार तलाठी व पाचशे मंडल अधिकाºयांची नव्याने भरती करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या मौजे गंगापूर (ता. भुदरगड) येथील चावडी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते.यावेळी पाटील म्हणाले, सध्या कार्यरत तलाठयांकडे अनेक सज्ज्यांचा कार्यभार असल्याने त्यांना अनेक गावांना फिरावे लागते. त्यासाठी त्यांना जनतेसाठी पटकन उपलब्ध होणे शक्य नसल्याने कामात अडचणी येत असतात. सरकारने याची दखल घेतली असून येत्या काही दिवसांत विशाल तलाठी भरती करणार आहे.

या भरतीमुळे महसूल खात्यात मनुष्यबळ वाढून तलाठी मंडळींवरील कामाचा ताण कमी करून त्यांच्याकडे काम करण्यासाठी मोजकीच गावे देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तलाठी जनतेच्या कामासाठी पटकन उपलब्ध होऊ शकेल आणि उतारेदेखील पटकन मिळतील. यासाठी तलाठी कार्यालय लवकरात लवकर उभारणी करण्याचा मानस आहे.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, भुदरगड, आजरा, राधानगरी या तीन तालुक्यांतील अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालये असूनदेखील इमारती जीर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी तलाठी कार्यालये भाड्याच्या खोलीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावा, त्याचबरोबर भुदरगड तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची समस्या आणि त्यांची स्थिती फारच चिंताजनक आहे. त्यामुळे विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले. कार्यकारी अभियंता एन. एम. पाठक, गटविकास अधिकारी माधुरी परीट, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा देसाई, सभापती सरिता वरंडेकर, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, सरपंच संगीता केणे, भाजप तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, पंडितराव केणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य धनाजी मोरुसकर, मौनी विद्यापीठ शासकीय प्रतिनिधी अलकेश कांदळकर, नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, निवासी नायब तहसीलदार शीतल देसाई, जिल्हा माहिती अधिकारी वर्षापाटोळे, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मानले.नशीबवान चावडीगंगापूरसारख्या खेडेगावातील एका सामान्य चावडीचे उद्घाटन महसूलमंत्र्यांच्या हस्ते होण्याचा मान या चावडीला मिळाला. राज्यातील ही एकमेव नशीबवान चावडी असावी, असे आबिटकर म्हणाले.