शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
2
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
3
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
4
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
5
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
6
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
7
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
8
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
9
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
10
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
11
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
12
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
13
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
14
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
15
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
16
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
17
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
18
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
19
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
20
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 

‘टेकवाडी’चा हट्ट नडतोय

By admin | Updated: August 1, 2014 00:36 IST

पुनर्वसनाला प्रतिसादच नाही : पुरामुळे जमीन खचण्याची शक्यता

कोल्हापूर : पुणे जिल्ह्यातील अख्खं माळीण गाव डोंगर कोसळल्यानंतर गाडलं गेल्याची घटना घडली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील टेकवाडी गाव चर्चेत आलंय. तुफान पाऊस, कुंभी व धामणी नद्यांना येणाऱ्या पुराच्या पाण्याचा वेढा आणि डोंगरावर असलेलं गाव खचण्याची शक्यता अशी संकटे असतानाही गावातच राहण्याचा हट्ट टेकवाडीतील ६७ कुटुंबांना नडतोय. वेळ, काळ आणि कोणतंही संकट सांगून येत नाही, तरीही गेल्या काही वर्षांपासून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना दाद न देता तेथेच राहण्याचा हट्ट सोडलेला नाही.कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर तिसंगीपैकी टेकवाडी या गावात ६७ कुटुंबे राहतात. या गावात १५० हून अधिक जनावरेही आहेत. प्रत्येक पावसाळ्यात कुंभी आणि धामणी नदीला पूर आला की, गाव पुराच्या पाण्याने चारही बाजूने वेढले जाते. यामुळे गावाचा संपर्कच तुटतो. गावाकडे जाणारे रस्ते बंद होतात. यावर्षीच्या पावसाळ्यात तीन वेळा गावाचा संपर्क तुटला आहे. तिसंगीमार्गे जाणाऱ्या एका बंधाऱ्यावरून गावकऱ्यांची जाण्या-येण्याची सोय होते, पण तेही धोकादायक आहे. जोपर्यंत पुराचे पाणी ओसरत नाही, तोपर्यंत ग्रामस्थ गावातच अडकून पडतात. टेकवाडी हे गाव उंच डोंगरावर आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या पुराचे पाणी कधीही गावात शिरत नाही; परंतु पावसाळ्यात जेव्हा कुंभी व धामणी नद्यांना पूर येतो तेव्हा पुराचे पाणी या डोंगराच्या खालच्या बाजूवर येऊन आदळते. पाण्याच्या दाबामुळे डोंगराचा काही भाग खालून निखळत चालला आहे. गगनबावडा तहसीलदार कार्यालयाने ही बाब लक्षात आल्यापासून टेकवाडीच्या ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचा पर्याय पुढे आणला आहे. तहसीलदार विकास भालेराव यांनी दोनवेळा ग्रामसभा घेऊन गावाच्या पुनर्वसनाचा प्रयत्न केला; परंतु गावकऱ्यांनी तिसंगी गावाजवळ पुनर्वसन करावे, अन्यथा नको, अशी भूमिका घेतली. घरे, शेतजमीन सोडून अन्यत्र जाण्यास त्यांचा ठाम विरोध आहे. त्यामुळे टेकवाडीची पुनर्वसन प्रक्रिया मध्येच थांबली आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्षी पावसाळ्यात तहसीलदार कार्यालयातर्फे तात्पुरत्या पुनर्वसनाचे नियोजन केले जाते. यंदाही तिसंगी महाविद्यालयातील काही खोल्यांत या ग्रामस्थांची तात्पुरत्या निवाऱ्याची, तसेच टॉयलेटची सोय केली असतानाही ग्रामस्थांनी नकार दिला आहे.टेकवाडीच्या गावकऱ्यांना दोन ग्रामसभा घेऊन संभाव्य धोका आणि पुनर्वसन याबाबत माहिती दिली आहे; परंतु त्यांचे असहकार्य मिळत आहे. गावाला पावसाळ्यात धोका आहे. पुराच्या पाण्याने गाव पूर्ण वेढले जाते. यंदाही पाण्याने वेढा दिलाय. त्यासाठी गावकऱ्याच्या सोयीसाठी एक फायबर मोटारबोट दिली आहे. धान्य व रॉकेलचा पुरवठा केला जातोय. पुराचे पाणी कधीही गावात शिरत नसले तरी डोंगर खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. - विकास भालेराव, तहसीलदार, गगनबावडा