शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

टाकळीवाडीतील अतिक्रमणे वादाच्या भोवऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:21 IST

दत्तवाड : दोन महिन्यांत ४० एकर गायरान जागेत पन्नासहून जास्त घरे बांधून अतिक्रमण झाले. मात्र, प्रशासन जुजबी कारवाईची नोटीस ...

दत्तवाड : दोन महिन्यांत ४० एकर गायरान जागेत पन्नासहून जास्त घरे बांधून अतिक्रमण झाले. मात्र, प्रशासन जुजबी कारवाईची नोटीस देऊन यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे या अतिक्रमणमागे कोणाचा वरदहस्त आहे, याची उलटसुलट चर्चा असली तरी शिरोळ तहसीलदारांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

टाकळवाडी (ता. शिरोळ) येथील गायरान गट नंबर ५९० मध्ये गेल्या दोन महिन्यांत गावातील ग्रामस्थांनी दोन गुंठ्यांपासून दहा गुंठ्यांपर्यंत प्लॉट पाडून अतिक्रमण केले आहे. या जागेवर रात्रीत घरे बांधली जात आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक काळात काही उमेदवारांनी संगनमताने ग्रामस्थांना अतिक्रमण करण्यास प्रोत्साहन दिल्याची तक्रारही निवडणूक आयोगाकडे झाली आहे, तर या अतिक्रमणावर रात्रीत घरे बांधण्यासाठी वीट, खडी, सिमेंट पुरवून मते मागितली, अशीही तक्रार करण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच व सदस्यांनी या अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याची तक्रारही झाली आहे.

गायरान जमिनीची देखभाल दुरुस्ती व संरक्षणाची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनावर असते. मात्र, ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य या जमिनीचे संरक्षण न करता ग्रामस्थांना जमिनी वाटप करीत असल्याची तक्रार तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ व गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्याकडे करण्यात आली आहे, तर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत उपोषणाचा मार्ग अवलंबल्यानंतर नोटिसा देऊन पडदा टाकण्याचे काम प्रशासन करीत असल्याचा आरोप होत आहे.

---------------

कोट - सरपंच व सदस्य स्वत:च्या स्वार्थासाठी गावच्या विकासासाठी असलेल्या जमिनीचे वाटप ग्रामस्थांना करीत आहेत, ही बाब गंभीर आहे. त्यामुळे तहसीलदार यांनी याबाबत सरपंच, सदस्यांवर कारवाई करून अतिक्रमण हटवावे.

- बाबासो वनकोरे, माजी सरपंच टाकळीवाडी.