शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

टाकळीत नुकसानग्रस्तांना मदत मिळवून देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

जयसिंगपूर : चंदूर-टाकळीदरम्यान कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या भरावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने ...

जयसिंगपूर : चंदूर-टाकळीदरम्यान कृष्णा नदीवर सुरू असलेल्या पुलाच्या भरावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही शासनाच्या समन्वयाने शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.

सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे शेतीचे नुकसान झालेल्या भागाची पाहणी मंत्री यड्रावकर यांनी केली. या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे प्रमुख उपस्थित होत्या.

मंत्री यड्रावकर म्हणाले, येथील कृष्णा नदीवर महाराष्ट्र व कर्नाटक दळणवळण जोडण्यासाठी बारा गाळ्यांच्या पुलाचे काम सुरू आहे. दहा ते पंधरा फूट मुरमीकरणाचा बांध घातला आहे. टाकळीकडील दोन गाळे रिकामे आहेत. अतिवृष्टीमुळे पंचगंगा, दूधगंगा व कृष्णा या नद्यांचे एकत्र पाणी नदीपात्रात आल्याने तसेच टाकळी ते चंदूर पुलाच्या मुरमीकरणामुळे टाकळीकडील दोन गाळ्यांच्यामधून संपूर्ण पाणी गेले नाही. त्यामुळे नदीपात्राच्या लगतच्या टाकळी हद्दीतील शेतकऱ्यांची शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. शिवाय नदीवरील विद्युत पंप, पाईप, केबल नदीपात्रात वाहून गेले आहेत.

या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्नाटक शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले.

याप्रसंगी सभापती दीपाली परीट, हर्षदा पाटील, हरिचंद्र पाटील, रणजित पाटील, उमेश पाटील, श्रीधर भोसले, पोलीस पाटील सुनीता पाटील, संजय पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो - ०२०७२०२१-जेएवाय-०५

फोटो ओळ - सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील शेतीचे झालेल्या नुकसानीची पाहणी राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. या वेळी कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.