शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लसीचे दोन डोस घेतले मृत्यूला ही दूर पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसमुळे अनेकांचा जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना ...

कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोसमुळे अनेकांचा जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिला डोस घेतल्यानंतरही कोरोना झालेल्या जिल्ह्यातील ७५ जणांचा मृत्यू झाला असून दुसरा डोस घेतल्यानंतर मात्र एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. लस घेतल्यावर आपल्यावर काहीतरी होईल म्हणून मागे सरलेल्या नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा निष्कर्ष आहे. दोन डोस घेतल्यानंतर व्यक्तीची प्रतिकारक्षमता वाढत असल्याने शासनानेही आता प्राधान्याने दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यामध्ये १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणास प्रारंभ झाला. मात्र सुरूवातीच्या काळात आरोग्य कर्मचारी सुद्धा ही लस घेण्यास इच्छुक नव्हते. सीपीआर मधील कर्मचाऱ्यांनी लस घ्यावी म्हणून त्यांना समजावून सांगा असे शेवटी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सांगावे लागले.

गेल्या पावणेचार महिन्यात जिल्ह्यातील पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्या रूग्णांपैकी १,६८३ जणांना पुन्हा कोरोनाची लागण झाली. लस घेतल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसातच यातील १,१५२ जणांना कोरोना झाला. यानंतर पहिल्या आठवड्यात ३५, दुसऱ्या आठवड्यात २३ तर तिसऱ्या आठवड्यात १५ जणांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे पहिला डोस घेतलेल्या एकूण ७५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

दुसरा डोस घेतल्यानंतर १६७ जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ५२ जण पहिल्या आठवड्यातच बाधित झाले. परंतु यानंतर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात एकही नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. ही मोठी दिलासादायक बाब आहे.

चौकट

जिल्ह्यातील आरोग्य संस्था : ९०

पहिला डोस घेतलेले नागरिक : ८ लाख ९० हजार २४६

दुसरा डोस घेतलेले नागरिक : २ लाख २३ हजार १२७

पहिल्या डोसची टक्केवारी : २६ टक्के

दुसऱ्या डोसची टक्केवारी : ६ टक्के

पहिला डोस घेतल्यानंतर कोरोना बाधित : १५१६

पहिला डोस घेतल्यानंतर झालेले मृत्यू : ७५

दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना बाधित : १६७

दुसरा डोस घेतल्यानंतर झालेले मृत्यू : ००