शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मतदारसंघात फेरमतदान घ्या

By admin | Updated: February 28, 2017 00:53 IST

शिरोली जि. प. : पराभूत उमेदवारांची मागणी; मशीनमध्ये फेरफार केल्याचा संशय

शिरोली : शिरोली जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या शिरोली, नागाव पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेत भाजपच्या उमेदवारांनी सत्ता आणि ताकद वापरून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये फेरफार केल्याचा संशय असल्याने या मतदारसंघाचे फेरमतदान घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे या मतदारसंघाचे शाहू आघाडीचे उमेदवार रूपाली खवरे, सुधीर पाटील, सुमन खोत, राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सुचित्रा खवरे, माधुरी पाटील, अजित घाटगे यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक आगवणे यांच्याकडे केली आहे.विरोधी उमेदवारांच्या गटातील कार्यकर्ते निकालापूर्वीच उमेदवारांचे मताधिक्य व निकाल अचूक सांगत होते. यावरून सत्ता आणि पदाची ताकद वापरून गैरप्रकार केल्याचा संशय येतो. त्यामुळे शिरोली जिल्हा परिषद व शिरोली, नागाव पंचायत समितीचे फेरमतदान घ्यावे. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक आगवणे यानी व्होटिंग मशीनच्या तांत्रिक तपासणीसह मतदानानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे घेतली जाणारी दक्षता याबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली. आंदोलकांना प्रवेशद्वारावरच अडविले. पोलिसांना झिडकारून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. निवेदन देण्यासाठी उमेदवार रूपाली खवरे, सुमन खोत, सुधीर पाटील, सुचित्रा खवरे, माधुरी पाटील, अजित घाटगे, माजी जि. प. सदस्य महेश चव्हाण, शिवसेनेचे हातकणंगले तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अनिल खवरे, प्रल्हाद खोत, सुरेश यादव, ज्योतिराम पोर्लेकर, सरदार मुल्ला, उत्तम पाटील, बाजीराव सातपुते, राजकुमार पाटील, सतीश रेडेकर, सुभाष चौगुले, नवरंग पाटील, विनोद अंची, शिवाजी पवार, भरत पाटील, भाऊसाहेब कोळी, राजाराम करपे मान्यवर उपस्थित होते.शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघात सत्ताधाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संगनमत करून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये फेरफार केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्यावतीने निदर्शने करण्यात आली.