शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाबतची दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST

कोल्हापूर : करिअरच्यादृष्टीने यंदाचे वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची आवश्यक ती दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या. भले त्यासाठी ...

कोल्हापूर : करिअरच्यादृष्टीने यंदाचे वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची आवश्यक ती दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या. भले त्यासाठी ऑनलाईन पध्दती वापरता येईल का? याचा विचार राज्य शासनाने करावा, अशी मागणी कोल्हापुरातील दहावी, बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांतून होत आहे.

शासनाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात येणार की रद्द होणार, याबाबत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून त्यांना धाकधूक लागली आहे. त्याबाबत शासनाने लवकर स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी पालक करीत आहेत.

बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मेदरम्यान, तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिल ते दि. २० मे या कालावधीत होणार आहे. त्यासाठी एकूण २,५९६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनामुळे जूनपासून दहावी, बारावीचे ऑनलाईन, तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून या इयत्तांचे ऑफलाईन वर्ग भरले. या दोन्ही पध्दतीतून गेले वर्षभर शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी केली. मात्र, आता तोंडावर परीक्षा आलेल्या असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्याने आणि आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश लवकरात लवकर देण्याची आवश्यकता आहे.

चौकट

या पर्यायांचा विचार करता येईल...

कोरोनाबाबतचा राज्यभरातील विचार करता, ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे एक तर टप्प्या-टप्प्याने ऑनलाईन परीक्षा घ्यावी अथवा इयत्ता नववी. अकरावीतील गुणांवर आधारित, संकलित पध्दतीने मूल्यमापन करून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करावे, असा पर्याय असल्याची प्रतिक्रिया माध्यमिक शिक्षक राजेश वरक यांनी दिली.

कोल्हापूर विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात...

दहावीची विद्यार्थी संख्या : १३८४५९

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : २४८६

बारावीची विद्यार्थी संख्या : १२११६९

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : ९२५