शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा स्वच्छ राहण्यासाठी उपाय करा

By admin | Updated: September 8, 2015 00:48 IST

एन. डी. पाटील : प्रादेशिक विकास आराखडा बैठकीत अभ्यास गटांनी मांडल्या सूचना; २९ सप्टेंबरला शासनाला अहवाल

कोल्हापूर : पंचगंगा नदी स्वच्छ अन् प्रवाहित ठेवण्यासाठी जे उपाय करावे लागतील ते करा. या नदीला मिळणाऱ्या उपनद्या, ओढे, ओहोळ व शेतातील पाणी शुद्ध स्वरूपात येण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी येथे केली. जिल्ह्णाच्या प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भातील अहवाल २९ सप्टेंबरला शासनाला पाठविला जाणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात प्रादेशिक विकास आराखड्यासंदर्भात शिफारशी मागविण्यासाठी संबंधित अभ्यास गटांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, नगररचना विभागाचे सहसंचालक एम. आर. खान आदींची होती.एन. डी. पाटील यांनी पंचगंगा नदी व उद्योगधंद्यांसाठी लागणाऱ्या जमिनींबाबत सूचना मांडल्या. पंचगंगा नदी स्वच्छ राहण्यासाठी नियोजन केले पाहिजे. यासाठी नदीशेजारील गावांचीही महत्त्वाची भूमिका आहे. उद्योगधंद्यांसाठी उद्योगपतींना चांगल्या जमिनीच का लागतात? लाखो एकर जमीन पडिक असून त्याचा विचार ते का करत नाहीत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला तसेच उद्योगपतींना जमिनी या मालकी हक्कानेच का हव्या आहेत? त्या जमिनींचे दर गगनाला भिडतात म्हणून त्यावर सट्टा लावण्यासाठी पाहिजे आहेत का? अशी चर्चा होत आहे. त्यासाठी निवृत्त न्यायाधिशांचा एक आयोग नेमावा. त्यासमोर उद्योगपतींनी जमिनींचे नियोजन काय करणार, याचे विवेचन करावे. व्यापारी, वाणिज्य व उद्योग अभ्यास गटाचे जे. एफ. पाटील यांनी आराखड्याचे नियोजन हे लोकांच्या गरजांमधून तयार झाले पाहिजे असे सांगितले. आराखड्यामध्ये क्रीडांगण, पार्किंग या गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे. पेठवडगाव-पारगावदरम्यान इंडस्ट्रीयल प्रोसेस, शाहूवाडी-बांबवडे दरम्यान इंडस्ट्रियल प्रोसेस, राधानगरी-गारगोटी परिसरात व्यापारी केंद्रे, मुरगूड-कागल दरम्यान पडिक जमिनीवर प्रकल्प, हुपरी येथे दाग-दागिने उत्पादन संशोधन केंद्र, कापशी येथे कातडी प्रक्रिया केंद्र, हमीदवाडा येथे साखर प्रक्रिया केंद, राधानगरी व आंबोली येथे वन उत्पादन केंद्र, शिरोली येथे वाहतूक प्रक्रिया केंद्र, हातकणंगले येथे मुद्रण व संशोधन केंद्र, अशा सूचना मांडून इंडस्ट्रियल लोकेशनबद्दल माहिती दिली.वस्त्रोद्योग उद्योजक गोरखनाथ सावंत यांनी आराखडा तयार करताना वस्त्रोद्योगाला स्वतंत्र स्थान दिल्याबद्दल अभ्यास गटांचे आभार मानले. शिरोळ व हातकणंगले हे तालुके ‘टेक्सटाईल हब’ म्हणून सरकारने घोषित करावेत, अशी सूचना मांडली. इचलकरंजीच्या आसपासच्या परिसरात वीस टेक्सटाईल झोन जाहीर करावेत. त्याचबरोबर या ठिकाणी ५०० मेगावॅटचे सबस्टेशन करावे, त्याकरीता २५ हेक्टर जमीन राखीव ठेवावी. ‘टेक्सटाईल झोन’ म्हणून ज्या जमिनी आरक्षित केल्या जातील. त्यातील टाऊनशीपसाठी व कामगारांच्या घरांसाठी काही जागा राखीव ठेवाव्यात. इचलकरंजी शहरातील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर एखाद्या डोंगराळ भागातील ६० ते ८० हेक्टर जमीन घेऊन त्यासाठी प्रोसेसर्स युनिट उभे करावे. बाहेर पडणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्याचे नियोजन करावे, अशा सूचना सावंत यांनी मांडल्या.शहराला बाह्यवळण रस्त्याची गरजवाहतूक परिवहन व दळणवळण अभ्यास गटाचे विनायक रेवणकर यांनी इंडस्ट्रीजच्या विकासासाठी प्रथम रस्ते विकास महत्त्वाचा असल्याची सूचना मांडली. शहराला नवीन बाह्णवळण रस्ता करण्याची आवश्यकता आहे. शहरातील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रं.४ वरील कागल चेकपोस्टजवळ प्रमुख वाहतूक केंद्र (ट्रान्स्पोर्ट हब) करावा तसेच कागल चेकपोस्ट ते वारणा पुलापर्यंत चौपदरी रस्त्यालगत १० मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ता करावा. कारण या रस्त्यावर छोट्या वाहनांची वर्दळ असल्याने वाहतुकीवर ताण पडतो.