शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जासाठी पुढाकार घ्या

By admin | Updated: August 28, 2016 00:38 IST

चंद्रकांतदादा पाटील : ‘चौंडेश्वरी’चे पुणे जनता बँकेत विलीनीकरण

इचलकरंजी : राज्यातील सहकार क्षेत्रातील सक्षम बॅँकांनी छोट्या शेतकऱ्यांसाठी सात वर्षे मुदतीचे विना व्याज कर्ज देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा बिनव्याजी निधी बड्या धनकोकडून उभा करावा. जेणेकरून निर्धन कर्जबाजारी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. शेतकऱ्यांनीसुद्धा अल्प रकमेचे हप्ते बांधून त्याची परतफेड करावी आणि अशा कर्जातून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन यासारख्या योजना शेतात राबवून शेतीच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करावी, असेही यावेळी पालकमंत्री म्हणाले. येथील चौंडेश्वरी बॅँकेचे पुणे जनता सहकारी बॅँकेत औपचारिक विलीनीकरणाच्या कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील ७०० पैकी सुमारे १०० सहकारी बॅँका बुडाल्या. त्यामुळे सहकारी बॅँकांवरील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास जनता बॅँकेसारख्या मोठ्या बॅँकांनी पुन्हा प्रस्थापित करावा. काही अडचणी असलेल्या बॅँका घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन करावे. तसेच सहकारी बॅँकांनी नवनवीन उद्योगधंद्यासाठी वेगवेगळे प्रकल्प अहवाल तयार ठेवून नवउद्योजक-व्यावसायिक तयार करावेत, असेही त्यांनी सांगितले. आपल्या प्रमुख भाषणात सहकारमंत्री सुभाषराव देशमुख म्हणाले, यंत्रमाग हा राज्यातील शेतीनंतर मोठा रोजगार देणारा उद्योग आहे. तरीसुद्धा मुद्रा योजनेमध्ये यंत्रमाग उद्योगाचा समावेश करून छोट्या यंत्रमाग उद्योजकांना बॅँकांनी अर्थसाहाय्य करावे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. बॅँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचीही भाषणे झाली. सह महाव्यवस्थापक दिलीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व पराग ठाकूर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, बॅँकेचे उपाध्यक्ष संजय लेले, बापूसाहेब पुजारी, विठ्ठलराव डाके, श्यामसुंदर मर्दा, सहकार भारतीचे अध्यक्ष प्रकाश गोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) चंद्रकांतदादांचे पाच लाख रुपये छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी बॅँकांनी पुढाकार घ्यावा. त्याची सुरुवात मी माझ्यापासून करीत असून, या योजनेसाठी पाच लाख रुपये देतो, असे सांगून त्यांनी या योजनेची सुरुवात केली.