शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

महालक्ष्मी तलावाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: June 9, 2015 00:12 IST

कसबा बीड येथील उपक्रम : लोकसहभागातून गाळ काढला

सावरवाडी : कसबा बीड (ता. करवीर) गावच्या महालक्ष्मी तलावातील साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी सामुदायिक ऐक्यातून राबविला. गाळ काढल्याने महालक्ष्मी तलावाने तब्बल ५० वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. गावच्या वायव्य दिशेला असलेल्या महालक्ष्मी सार्वजनिक प्राचीन तलावात गेली पाच दशके गाळ साचलेला होता. गाळामुळे तलावातील पाणी दूषित बनले होते. तलावाच्या सभोवार पानवनस्पती, केंदाळ प्रचंड स्वरूपात वाढलेली होती. दूषित पाण्यामुळे तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडत होते. तलावाच्या परिसरात विषारी सापांचे वास्तव्य होते. तलावातील कुजलेल्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण बनले होते. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून सुमारे चार हजार ट्राली गाळ काढण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी या गाळाचा शेतीमध्ये खत म्हणून वापर केला आहे. सलग उपक्रम ग्रामपंचयतीने राबविल्याने महालक्ष्मी सार्वजनिक तलावातील गाळ काढण्यात आला. महालक्ष्मी ऐतिहासिक तलाव परिसरात वैभव उभे करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. तलावाच्या सभोवार दगडी संरक्षण भिंत, कुंपण उभारण्यात येणार आहे. पावसाळा ऋतूमध्ये पाणी साठवण करून ग्रामपंचायतीतर्फे मच्छ व्यवसाय उभारण्यात येणार आहे. चार हजार ट्राली गाळ या तलावातून काढल्याने हा परिसर रम्य ठिकाण बनू लागले आहे. या तलावाजवळ अकराव्या शतकातील महालक्ष्मी मंदिर आहे.लोकसहभागातून विकासाचे नवे पर्व उभारले जाते. ५० वर्षांतील साचलेला गाळ काढल्यामुळे कसबा बीड गावाला नवे वैभव प्राप्त झाले आहे. सरंक्षण भिंतीसाठी राज्य शासनाने अनुदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावचे ऐक्य आणि लोकसहभाग यामुळे हा उपक्रम राबविला आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य