शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
4
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
5
अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
6
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
7
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
8
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
9
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
10
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
12
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
13
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
14
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
15
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
16
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
17
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
18
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
19
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
20
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश

महालक्ष्मी तलावाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: June 9, 2015 00:12 IST

कसबा बीड येथील उपक्रम : लोकसहभागातून गाळ काढला

सावरवाडी : कसबा बीड (ता. करवीर) गावच्या महालक्ष्मी तलावातील साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी सामुदायिक ऐक्यातून राबविला. गाळ काढल्याने महालक्ष्मी तलावाने तब्बल ५० वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. गावच्या वायव्य दिशेला असलेल्या महालक्ष्मी सार्वजनिक प्राचीन तलावात गेली पाच दशके गाळ साचलेला होता. गाळामुळे तलावातील पाणी दूषित बनले होते. तलावाच्या सभोवार पानवनस्पती, केंदाळ प्रचंड स्वरूपात वाढलेली होती. दूषित पाण्यामुळे तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडत होते. तलावाच्या परिसरात विषारी सापांचे वास्तव्य होते. तलावातील कुजलेल्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण बनले होते. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून सुमारे चार हजार ट्राली गाळ काढण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी या गाळाचा शेतीमध्ये खत म्हणून वापर केला आहे. सलग उपक्रम ग्रामपंचयतीने राबविल्याने महालक्ष्मी सार्वजनिक तलावातील गाळ काढण्यात आला. महालक्ष्मी ऐतिहासिक तलाव परिसरात वैभव उभे करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. तलावाच्या सभोवार दगडी संरक्षण भिंत, कुंपण उभारण्यात येणार आहे. पावसाळा ऋतूमध्ये पाणी साठवण करून ग्रामपंचायतीतर्फे मच्छ व्यवसाय उभारण्यात येणार आहे. चार हजार ट्राली गाळ या तलावातून काढल्याने हा परिसर रम्य ठिकाण बनू लागले आहे. या तलावाजवळ अकराव्या शतकातील महालक्ष्मी मंदिर आहे.लोकसहभागातून विकासाचे नवे पर्व उभारले जाते. ५० वर्षांतील साचलेला गाळ काढल्यामुळे कसबा बीड गावाला नवे वैभव प्राप्त झाले आहे. सरंक्षण भिंतीसाठी राज्य शासनाने अनुदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावचे ऐक्य आणि लोकसहभाग यामुळे हा उपक्रम राबविला आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य