शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मी तलावाने घेतला मोकळा श्वास

By admin | Updated: June 9, 2015 00:12 IST

कसबा बीड येथील उपक्रम : लोकसहभागातून गाळ काढला

सावरवाडी : कसबा बीड (ता. करवीर) गावच्या महालक्ष्मी तलावातील साचलेला गाळ लोकसहभागातून काढण्याचा उपक्रम ग्रामस्थांनी सामुदायिक ऐक्यातून राबविला. गाळ काढल्याने महालक्ष्मी तलावाने तब्बल ५० वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला. गावच्या वायव्य दिशेला असलेल्या महालक्ष्मी सार्वजनिक प्राचीन तलावात गेली पाच दशके गाळ साचलेला होता. गाळामुळे तलावातील पाणी दूषित बनले होते. तलावाच्या सभोवार पानवनस्पती, केंदाळ प्रचंड स्वरूपात वाढलेली होती. दूषित पाण्यामुळे तलावातील मासे दरवर्षी मृत्युमुखी पडत होते. तलावाच्या परिसरात विषारी सापांचे वास्तव्य होते. तलावातील कुजलेल्या दूषित पाण्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण बनले होते. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने करवीर पंचायत समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून सुमारे चार हजार ट्राली गाळ काढण्यात आला. अनेक शेतकऱ्यांनी या गाळाचा शेतीमध्ये खत म्हणून वापर केला आहे. सलग उपक्रम ग्रामपंचयतीने राबविल्याने महालक्ष्मी सार्वजनिक तलावातील गाळ काढण्यात आला. महालक्ष्मी ऐतिहासिक तलाव परिसरात वैभव उभे करण्याचा ग्रामस्थांचा मानस आहे. तलावाच्या सभोवार दगडी संरक्षण भिंत, कुंपण उभारण्यात येणार आहे. पावसाळा ऋतूमध्ये पाणी साठवण करून ग्रामपंचायतीतर्फे मच्छ व्यवसाय उभारण्यात येणार आहे. चार हजार ट्राली गाळ या तलावातून काढल्याने हा परिसर रम्य ठिकाण बनू लागले आहे. या तलावाजवळ अकराव्या शतकातील महालक्ष्मी मंदिर आहे.लोकसहभागातून विकासाचे नवे पर्व उभारले जाते. ५० वर्षांतील साचलेला गाळ काढल्यामुळे कसबा बीड गावाला नवे वैभव प्राप्त झाले आहे. सरंक्षण भिंतीसाठी राज्य शासनाने अनुदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. गावचे ऐक्य आणि लोकसहभाग यामुळे हा उपक्रम राबविला आहे. - राजेंद्र सूर्यवंशी, करवीर पंचायत समिती सदस्य