शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘एस.आय.टी’.चा तळ कोल्हापुरात करा

By admin | Updated: December 17, 2015 01:20 IST

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी : जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाच्या तपास प्रकरणी नेमण्यात आलेले एस.आय.टी.प्रमुख व त्यांचे कार्यालय कोल्हापुरात असावे, जेणेकरून या प्रकरणाचा तपास शीघ्रगतीने होईल; या मागणीसह खुनातील आरोपींवर देशद्रोहाचाही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. पानसरे यांच्या हत्याकांडातील गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र व वाहने पोलीस कधी ताब्यात घेणार आहेत; याशिवाय गुन्ह्याचा तपास लवकर होण्यासाठी एस.आय.टी.च्या प्रमुखांचे मुख्यालय कोल्हापुरात करावे. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक होईपर्यंत व तपास पूर्ण होईपर्यंत एस.आय.टी.च्या पथकाने येथेच थांबावे. शहीद गोविंद पानसरे हे स्वातंत्र्यसैनिक व समाजसुधारक होते. त्यामुळे त्यांच्या खुनातील आरोपींवर देशद्रोहाचे कलमही लावावे. या खुनातील संशयित म्हणून पकडण्यात आलेला समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा साधक/हस्तक असल्याचे सिद्ध झाले आहे. यापूर्वीही संस्थेच्या हस्तकांनी व अनुयायांनी बॉम्बस्फोटासारख्या गंभीर व अतिरेकी अनेक कारवाया केल्या आहेत. यासह या खटल्यात तांत्रिक चूक राहू नये, याकरिताही निष्णात वकिलांची मदत घेऊन पुरवणी दोषारोपपत्र दाखल करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. निवेदन दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी अशा प्रकारे चूक आम्ही दोषारोपपत्रात ठेवणार नाही. याशिवाय माझी टीम बोलण्यापेक्षा काम करण्यावर अधिक भर देणार आहे. त्यामुळे आमचे काम यापुढे तुम्हाला दिसेलच, अशी ग्वाही दिली. यावेळी सतीशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, बी. एल. बरगे, आशा बरगे, दिलदार मुजावर, दिनकर सूर्यवंशी, रियाज शेख, प्रा. आशा कुकडे, नामदेव पाटील, महादेव आवटे, सिद्धार्थ कांबळे, अजित विचारे, मधुकर माने, अतुल कवाळे, गणेश बुचडे, रूपाली कदम, प्रशांत अंबी, समाधान ठोणगे, मोनेश सुतार, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.