शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:52 IST

उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे दडपशाहीच्या मार्गाने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच ...

उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे दडपशाहीच्या मार्गाने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच धरण चालू करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदनातून देण्यात आला आहे.

गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या आंबेओहळ प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी प्रयत्न केले असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या अजूनही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत यासाठी लढण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे काम चालू देणार नाही.

पाटबंधारे विभागातर्फे जबरदस्तीने काम सुरू केल्याने धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलकांवर खोटे खटले दाखल केले. धरणग्रस्तांवरील खटले त्वरित मागे घेण्यात यावेत.

भाजप उपाध्यक्ष अशोक चराटी, तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, सरचिटणीस अतिशकुमार देसाई, संतोष बेलवाडे, राजू पोतनीस, वैभव नार्वेकर, रामदास मिसाळ, भास्कर भाईगडे यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन दिले.

-----------------------

फोटो ओळी : गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देताना आजरा भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार. शेजारी भाजप उपाध्यक्ष अशोक चराटी, राजू पोतनीस, अतिशकुमार देसाई, राजू देशपांडे, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०९१२२०२०-गड-०१