शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:52 IST

उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे दडपशाहीच्या मार्गाने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच ...

उत्तूर : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे दडपशाहीच्या मार्गाने दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेऊन धरणग्रस्तांचे पुनर्वसन करा, मगच धरण चालू करा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदनातून देण्यात आला आहे.

गेल्या २० वर्षांपासून रखडलेल्या आंबेओहळ प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने वेळोवेळी प्रयत्न केले असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या अजूनही मागण्या मान्य झालेल्या नाहीत. जोपर्यंत शेवटच्या माणसाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत यासाठी लढण्याची भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. संपूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाचे काम चालू देणार नाही.

पाटबंधारे विभागातर्फे जबरदस्तीने काम सुरू केल्याने धरणग्रस्तांनी आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलकांवर खोटे खटले दाखल केले. धरणग्रस्तांवरील खटले त्वरित मागे घेण्यात यावेत.

भाजप उपाध्यक्ष अशोक चराटी, तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, सरचिटणीस अतिशकुमार देसाई, संतोष बेलवाडे, राजू पोतनीस, वैभव नार्वेकर, रामदास मिसाळ, भास्कर भाईगडे यांच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन दिले.

-----------------------

फोटो ओळी : गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना निवेदन देताना आजरा भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार. शेजारी भाजप उपाध्यक्ष अशोक चराटी, राजू पोतनीस, अतिशकुमार देसाई, राजू देशपांडे, आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०९१२२०२०-गड-०१