शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

सर्वसामान्यांचीही कामेही घ्या

By admin | Updated: December 29, 2014 23:47 IST

चंद्रकांत पाटील : जिल्हा नियोजन समितीची बैठक; विकासकामांबाबत चर्चा

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीकडे येणाऱ्या निधीतून आमदारांनी सुचविलेली कामे घेण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदापासून सर्वसामान्यांनीही सुचविलेली कामे समितीच्या निधीतून केली जाणार आहेत. यासाठी सामान्यांनी कामे सुचवावीत, असे आवाहन मी स्वत: लवकरच पत्रकार परिषद घेऊन करणार आहे, अशी माहिती सहकार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीची आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माने व सुभेदार यांच्याशी मंत्री पाटील यांनी जिल्हा विकास नियोजन आराखड्यात समावेश करावयाच्या विविध कामांसंबंधी चर्चा केली. नियोजन समितीतून आमदारांनी आणि सदस्यांनी सुचविलेली कामे करण्याला प्राधान्य दिले जाते. यामुळे गटा-तटातून काही कामे होत नाहीत, याकडे मंत्री पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, अनेक विकासकामांचा थेट संबंध सामान्य नागरिकांशी येत असतो. त्यामुळे यंदापासून केवळ आमदारांनी सुचविलेली कामे न घेता सामान्यांनी सांगितलेलीही कामे घ्यावयाची आहेत. शाळांची अपूर्ण संरक्षण भिंत बांधणे, पूर्णपणे नव्याने भिंत बांधणे, रस्ता तयार करणे, रस्त्याची कामे सुचविण्याचे आवाहन जिल्ह्यातील लोकांना करणार आहे. शासनाच्या विविध विकासकामांसाठी नियोजन समितीकडे येणारा सर्व निधी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. मार्च जवळ आल्यानंतरच खर्च करण्यासाठी धडपडण्याऐवजी आतापासून नियोजन करावे. डोंगरी व सधन तालुक्यांना निधी मिळायला हवा. विकासकामे सुचविण्यात सर्वसामान्यांचा सहभागही महत्त्वाचा आहे. सध्या निवडल्या जाणाऱ्या कामांत सामान्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश होत नाही. यावेळी जिल्हाधिकारी माने यांनी, नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)डोंगरी, सधन तालुक्यांना निधी देणारविकासकामांचा संबंध थेट नागरिकांशी येतो, त्यामुळे गट-तट न पाहता आमदारांबरोबर सामान्य नागरिकांनी सुचविलेल्या कामांना निधी द्या.शाळांची व रस्त्यांची कामे सुचविण्यासाठी आवाहननियोजन समितीकडील निधीचे योग्य नियोजन करावे.