शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

सर्वसामान्यांचीही कामेही घ्या

By admin | Updated: December 29, 2014 23:47 IST

चंद्रकांत पाटील : जिल्हा नियोजन समितीची बैठक; विकासकामांबाबत चर्चा

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीकडे येणाऱ्या निधीतून आमदारांनी सुचविलेली कामे घेण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र, यंदापासून सर्वसामान्यांनीही सुचविलेली कामे समितीच्या निधीतून केली जाणार आहेत. यासाठी सामान्यांनी कामे सुचवावीत, असे आवाहन मी स्वत: लवकरच पत्रकार परिषद घेऊन करणार आहे, अशी माहिती सहकार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.जिल्हा नियोजन समितीची आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माने व सुभेदार यांच्याशी मंत्री पाटील यांनी जिल्हा विकास नियोजन आराखड्यात समावेश करावयाच्या विविध कामांसंबंधी चर्चा केली. नियोजन समितीतून आमदारांनी आणि सदस्यांनी सुचविलेली कामे करण्याला प्राधान्य दिले जाते. यामुळे गटा-तटातून काही कामे होत नाहीत, याकडे मंत्री पाटील यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, अनेक विकासकामांचा थेट संबंध सामान्य नागरिकांशी येत असतो. त्यामुळे यंदापासून केवळ आमदारांनी सुचविलेली कामे न घेता सामान्यांनी सांगितलेलीही कामे घ्यावयाची आहेत. शाळांची अपूर्ण संरक्षण भिंत बांधणे, पूर्णपणे नव्याने भिंत बांधणे, रस्ता तयार करणे, रस्त्याची कामे सुचविण्याचे आवाहन जिल्ह्यातील लोकांना करणार आहे. शासनाच्या विविध विकासकामांसाठी नियोजन समितीकडे येणारा सर्व निधी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. मार्च जवळ आल्यानंतरच खर्च करण्यासाठी धडपडण्याऐवजी आतापासून नियोजन करावे. डोंगरी व सधन तालुक्यांना निधी मिळायला हवा. विकासकामे सुचविण्यात सर्वसामान्यांचा सहभागही महत्त्वाचा आहे. सध्या निवडल्या जाणाऱ्या कामांत सामान्यांनी सुचविलेल्या कामांचा समावेश होत नाही. यावेळी जिल्हाधिकारी माने यांनी, नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगितले. बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे यांच्यासह सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)डोंगरी, सधन तालुक्यांना निधी देणारविकासकामांचा संबंध थेट नागरिकांशी येतो, त्यामुळे गट-तट न पाहता आमदारांबरोबर सामान्य नागरिकांनी सुचविलेल्या कामांना निधी द्या.शाळांची व रस्त्यांची कामे सुचविण्यासाठी आवाहननियोजन समितीकडील निधीचे योग्य नियोजन करावे.