शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

सीईटीपी व कत्तलखान्यावर कारवाई करा

By admin | Updated: November 22, 2014 00:17 IST

इचलकरंजी पालिकेवर शिवसेनेचा मोर्चा : नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्धारे मागणी

इचलकरंजी : शहरातील लाखेनगर-जाधव मळा येथे असलेल्या सीईटीपी व कत्तलखाना या प्रकल्प परिसरात प्रदूषण आणि कुत्र्यांच्या उपद्रवामुळे तेथील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. म्हणून सीईटीपीच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा आणि कत्तलखाना ताबडतोब बंद करावा, अशी मागणी करणारा मोर्चा शिवसेनेच्यावतीने नगरपालिकेवर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख महादेव गौड, नगरसेवक सयाजी चव्हाण, आदींनी केले.लाखेनगर-जाधव मळा परिसरातील नागरिकांचा निघालेला मोर्चा नगरपालिकेवर आला. नगरपालिकेच्या कार्यालयात आलेल्या मोर्चाच्यावतीने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना निवेदन देण्यात आले. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (सीईटीपी) उग्र वास व आवाज येत असल्याने त्या परिसरात असलेले नागरिक विशेषत: लहान मुलांना मोठा त्रास होत आहे. त्यामुळे लोकांच्या जीवनाशी खेळणाऱ्या सीईटीपीच्या व्यवस्थापनावर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच कत्तलखाना असलेल्या परिसरामध्ये सुमारे आठ ते दहा हजार लोकसंख्या राहात आहे. कत्तलखान्यामध्ये मोठी जनावरे, तसेच मृत झालेली जनावरेसुद्धा कत्तल केली जातात. या जनावरांचे मांस बाहेर नेताना योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याने दुर्गंधी सुटते. त्यामुळे त्या परिसरामध्ये कुत्र्यांचा नेहमी वावर असतो. या कुत्र्यांचा त्रास होत असतो. तसेच आसपास पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे डेंग्यूसारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी हा कत्तलखाना ताबडतोब बंद करावा; अन्यथा शिवसेनेला तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.आंदोलनकर्ते व नगराध्यक्ष बिरंजे यांच्यात झालेल्या चर्चेनंतर दोन्ही ठिकाणी भेट देऊन योग्य ती कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)इचलकरंजीच्या नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांना निवेदन देताना महादेव गौड. यावेळी सयाजी चव्हाण, सुनील साळुंखे, राजू आलासे, आदी उपस्थित होते.