शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या विषयात कोणाचीही गय करू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांवर कडक कारवाई करा, या विषयात कोणाचीही गय करू नका, असे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आज, बुधवारी विभागीय आयुक्त सौरभ यांनी बैठक आयोजित केली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी देसाई यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, पंचगंगा नदीला जोडणारे नाले वळवण्याचे काम पूर्ण होईपर्यंत हे सांडपाणी अन्यत्र वळवून त्यावर प्रक्रिया करता येते का हे पाहावे, प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या उद्योगधंद्यांवर थेट कारवाई करावी, ज्या ग्रामपंचायतींना सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी मिळाला आहे, त्यांनी तातडीने कामाला सुरुवात करावी, इचलकरंजी नगरपालिकेने नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा व त्या त्या विभागांना ही जबाबदारी सोपवावी.