शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

कडवी नदी स्वच्छतेसाठी तळवडे ग्रामस्थ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 00:35 IST

कडवी नदी स्वच्छतेसाठी तळवडे ग्रामस्थ सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : कडवी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नदीपात्र सफाईसाठी रविवारी तळवडे ग्रामस्थांनी उठाव केला. शनिवारी रात्री ग्रामस्थांची बैठक घेऊन रविवारी दिवसभर गावच्या हद्दीतील पात्र ग्रामस्थांनी स्वच्छ केले. यावेळी गाळ काढण्यास ग्राममंदिराचे पुजारी जयराम पाटील यांनी जे.सी.बी.चे पूजन व श्रीफळ वाढवून प्रारंभ केला. शैलेश व तृप्ती गर्दे यांनी पणती प्रवाहित करून श्रमदानास प्रारंभ केला.यावेळी कोल्हापूरच्या प्रभाग मंडळाच्या भाजप अध्यक्षा सुषमा गर्दे म्हणाल्या, नदी जंगल परिसरातून वाहत असल्याने पात्र गवताचे केंदाळ व झुडपांनी व्यापले आहे. येथील मुबलक पडणाऱ्या पावसाचे पाणी पूर्वभागात पोहोचविण्यासाठी नदीपात्र जिवंत ठेवणे गरजेचे आहे. गावोगावचे शेतकरी एकत्र येऊन नदी पुनरुज्जीवनाचा राबवीत असलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. नदी स्वच्छतेबरोबर पाण्याचे प्रदूषण होणार नाही यासाठी स्थानिक तरुणांनी जागृत व्हावे.यावेळी पोलीस पाटील गणेश शेलार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष भरत हातणकर, तरुण मंडळाचे प्रमुख सुनील हातणकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मारुती पाटील, मनोहर घावरे यांनी पुढाकार घेतला. शिराज शेख, केर्लेचे तंटामुक्त अध्यक्ष गणेश पाटील, धोंडिबा तवलके, अरविंद कल्याणकर, सरदार वरेकर यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सह्यागिरी महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे नदी स्वच्छतेला लोकसहभागाचा प्रतिसाद मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिराज शेख यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे पर्यवेक्षक दिलीप गुरव व राजेंद्र लाड यांनी नदीचे महत्त्व विषद केले. देणाऱ्यांचे हात हजारोहुंबवली येथील मुंबईचे व्यावसाईक शशिकांत चव्हाण यांनी सहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली, तर कोल्हापूरच्या गर्दे यांनी डिजिटलद्वारे जनजागृती फलक देण्याचे जाहीर करून पाच तासांचे भाडे देऊ केले. करंजोशीचे पाटबंधारे विभागाचे अभियंता पी. एम. बरसाळे यांनी दोन हजार पोहोच केले. गेले पंधरा दिवस लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम चालली आहे. आठखूरवाडी, केर्ले, तळवडे येथील नदीपात्रातील सुमारे दीड हजार फूट लांब व साठ फूट रुंद असा गाळ, गवत व केंदाळ काढण्यात आले. उद्या, मंगळवारी हुंबवली येथे ग्रामस्थ श्रमदान करणार असल्याचे शिवाजी पाटील यांनी जाहीर केले. यावेळी येथील के.टी.वेअरवर मद्यसेवनास बसलेल्या टोळक्याला ग्रामस्थांनी मज्जाव केला.