शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कडवी नदी स्वच्छतेसाठी तळवडे ग्रामस्थ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 00:35 IST

कडवी नदी स्वच्छतेसाठी तळवडे ग्रामस्थ सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : कडवी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नदीपात्र सफाईसाठी रविवारी तळवडे ग्रामस्थांनी उठाव केला. शनिवारी रात्री ग्रामस्थांची बैठक घेऊन रविवारी दिवसभर गावच्या हद्दीतील पात्र ग्रामस्थांनी स्वच्छ केले. यावेळी गाळ काढण्यास ग्राममंदिराचे पुजारी जयराम पाटील यांनी जे.सी.बी.चे पूजन व श्रीफळ वाढवून प्रारंभ केला. शैलेश व तृप्ती गर्दे यांनी पणती प्रवाहित करून श्रमदानास प्रारंभ केला.यावेळी कोल्हापूरच्या प्रभाग मंडळाच्या भाजप अध्यक्षा सुषमा गर्दे म्हणाल्या, नदी जंगल परिसरातून वाहत असल्याने पात्र गवताचे केंदाळ व झुडपांनी व्यापले आहे. येथील मुबलक पडणाऱ्या पावसाचे पाणी पूर्वभागात पोहोचविण्यासाठी नदीपात्र जिवंत ठेवणे गरजेचे आहे. गावोगावचे शेतकरी एकत्र येऊन नदी पुनरुज्जीवनाचा राबवीत असलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. नदी स्वच्छतेबरोबर पाण्याचे प्रदूषण होणार नाही यासाठी स्थानिक तरुणांनी जागृत व्हावे.यावेळी पोलीस पाटील गणेश शेलार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष भरत हातणकर, तरुण मंडळाचे प्रमुख सुनील हातणकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मारुती पाटील, मनोहर घावरे यांनी पुढाकार घेतला. शिराज शेख, केर्लेचे तंटामुक्त अध्यक्ष गणेश पाटील, धोंडिबा तवलके, अरविंद कल्याणकर, सरदार वरेकर यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सह्यागिरी महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे नदी स्वच्छतेला लोकसहभागाचा प्रतिसाद मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिराज शेख यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे पर्यवेक्षक दिलीप गुरव व राजेंद्र लाड यांनी नदीचे महत्त्व विषद केले. देणाऱ्यांचे हात हजारोहुंबवली येथील मुंबईचे व्यावसाईक शशिकांत चव्हाण यांनी सहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली, तर कोल्हापूरच्या गर्दे यांनी डिजिटलद्वारे जनजागृती फलक देण्याचे जाहीर करून पाच तासांचे भाडे देऊ केले. करंजोशीचे पाटबंधारे विभागाचे अभियंता पी. एम. बरसाळे यांनी दोन हजार पोहोच केले. गेले पंधरा दिवस लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम चालली आहे. आठखूरवाडी, केर्ले, तळवडे येथील नदीपात्रातील सुमारे दीड हजार फूट लांब व साठ फूट रुंद असा गाळ, गवत व केंदाळ काढण्यात आले. उद्या, मंगळवारी हुंबवली येथे ग्रामस्थ श्रमदान करणार असल्याचे शिवाजी पाटील यांनी जाहीर केले. यावेळी येथील के.टी.वेअरवर मद्यसेवनास बसलेल्या टोळक्याला ग्रामस्थांनी मज्जाव केला.