शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

कडवी नदी स्वच्छतेसाठी तळवडे ग्रामस्थ सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2017 00:35 IST

कडवी नदी स्वच्छतेसाठी तळवडे ग्रामस्थ सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कआंबा : कडवी नदी स्वच्छता अभियान अंतर्गत नदीपात्र सफाईसाठी रविवारी तळवडे ग्रामस्थांनी उठाव केला. शनिवारी रात्री ग्रामस्थांची बैठक घेऊन रविवारी दिवसभर गावच्या हद्दीतील पात्र ग्रामस्थांनी स्वच्छ केले. यावेळी गाळ काढण्यास ग्राममंदिराचे पुजारी जयराम पाटील यांनी जे.सी.बी.चे पूजन व श्रीफळ वाढवून प्रारंभ केला. शैलेश व तृप्ती गर्दे यांनी पणती प्रवाहित करून श्रमदानास प्रारंभ केला.यावेळी कोल्हापूरच्या प्रभाग मंडळाच्या भाजप अध्यक्षा सुषमा गर्दे म्हणाल्या, नदी जंगल परिसरातून वाहत असल्याने पात्र गवताचे केंदाळ व झुडपांनी व्यापले आहे. येथील मुबलक पडणाऱ्या पावसाचे पाणी पूर्वभागात पोहोचविण्यासाठी नदीपात्र जिवंत ठेवणे गरजेचे आहे. गावोगावचे शेतकरी एकत्र येऊन नदी पुनरुज्जीवनाचा राबवीत असलेला हा उपक्रम आदर्शवत आहे. नदी स्वच्छतेबरोबर पाण्याचे प्रदूषण होणार नाही यासाठी स्थानिक तरुणांनी जागृत व्हावे.यावेळी पोलीस पाटील गणेश शेलार, मुंबई मंडळाचे अध्यक्ष भरत हातणकर, तरुण मंडळाचे प्रमुख सुनील हातणकर, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मारुती पाटील, मनोहर घावरे यांनी पुढाकार घेतला. शिराज शेख, केर्लेचे तंटामुक्त अध्यक्ष गणेश पाटील, धोंडिबा तवलके, अरविंद कल्याणकर, सरदार वरेकर यांच्यासह तरुण मंडळांचे कार्यकर्ते, सह्यागिरी महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे नदी स्वच्छतेला लोकसहभागाचा प्रतिसाद मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शिराज शेख यांनी स्पष्ट केले. यावेळी पाटबंधारे विभागाचे पर्यवेक्षक दिलीप गुरव व राजेंद्र लाड यांनी नदीचे महत्त्व विषद केले. देणाऱ्यांचे हात हजारोहुंबवली येथील मुंबईचे व्यावसाईक शशिकांत चव्हाण यांनी सहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली, तर कोल्हापूरच्या गर्दे यांनी डिजिटलद्वारे जनजागृती फलक देण्याचे जाहीर करून पाच तासांचे भाडे देऊ केले. करंजोशीचे पाटबंधारे विभागाचे अभियंता पी. एम. बरसाळे यांनी दोन हजार पोहोच केले. गेले पंधरा दिवस लोकसहभागातून गाळ काढण्याची मोहीम चालली आहे. आठखूरवाडी, केर्ले, तळवडे येथील नदीपात्रातील सुमारे दीड हजार फूट लांब व साठ फूट रुंद असा गाळ, गवत व केंदाळ काढण्यात आले. उद्या, मंगळवारी हुंबवली येथे ग्रामस्थ श्रमदान करणार असल्याचे शिवाजी पाटील यांनी जाहीर केले. यावेळी येथील के.टी.वेअरवर मद्यसेवनास बसलेल्या टोळक्याला ग्रामस्थांनी मज्जाव केला.