शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

पडसाळी-काजिर्डा घाट फोडण्यासाठी लोकवर्गणीतून यंत्रणा सज्ज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पडसाळी हे गाव पश्चिम पन्हाळ्याच्या शेवटच्या टोकाला व कोकणातील काजिर्डा घाटाच्या माथ्यावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बाजारभोगाव : पन्हाळा तालुक्यातील पडसाळी हे गाव पश्चिम पन्हाळ्याच्या शेवटच्या टोकाला व कोकणातील काजिर्डा घाटाच्या माथ्यावर वसलेलं छोटसं गाव आहे. पडसाळी ते काजिर्डा या घाटाचे काम सध्या मनसेच्या माध्यमातून व लोकवर्गणीतून लोकांनी सुरू केले आहे. त्यामुळे पडसाळीसह अनेक गावांचा विकास होणार आहे.

पडसाळी ते काजिर्डा हे अवघ्या तीन ते चार किलोमीटरचे अंतर पश्चिम महाराष्ट्राला जोडले जाणार आहे. कारण कोल्हापूर, कळे, बाजारभोगाव, काळजवडे व पडसाळीसह अनेक गावांचा काजिर्डा घाटाशी थेट संपर्क जोडला जाणार आहे. या नव्या घाटामुळे अवघड वळणाचा घाट वाचणार आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण घटणार आहे. हा घाट झाल्यास गगनबावडा, भुईबावडा व अनुस्कुरा या घाटाला हा घाट हा सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे एक ते दोन तासांचा प्रवास वाचणार आहे. रत्नागिरीतल्या राजापूरमध्ये अतिदुर्गम परिसरात काजिर्डा गाव वसलेले आहे.

मात्र, हा रस्ता करण्यासाठी १९७४ ते १९७७ पासून पडसाळी व काजिर्डा परिसरातील लोक धडपडत आहेत. मात्र, सरकारने याची दखल न घेतल्यामुळे पडसाळी व काजिर्डा परिसरातील लोकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी व तरुणांनी एकजुटीने हा घाट फोडण्यासाठी लोकवर्गणी करून श्रमदानातून व मनसेच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू केले आहे. काजिर्डा गावातून हा रस्ता थेट जातो; पण हा पन्हाळा तालुक्यातील पडसाळी गावातून बाजार भोगावमध्ये जात असून, हे अंतर केवळ वीस ते बावीस किलोमीटरचे ! हा रस्ता झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल ६० ते ७० गावे थेट रत्नागिरीला जोडली जाणार आहेत.

१९७४ ते १९७७ या दरम्यान हा घाट रोजगार हमीच्या माध्यमातून फोडण्यात आला होता. मात्र, रस्ताच झाला नाही. त्यानंतर हे काम रखडले. त्यामुळे काजिर्डा व पडसाळी परिसरातील लोकांनी हा रस्ता पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. हा रस्ता झाल्यानंतर अनेक गरीब कुटुंबांच्या संसाराला हातभार लागणार आहे. हा रस्ता झाला तर कोल्हापूर ते बाजारभोगाव परिसरातील अनेक गावे विकासाच्या महामार्गावर येणार असून, शेतकरी वर्गाची शेतमालाची ने-आण करण्यासाठी हा घाट सोयीस्कर ठरणार आहे.

चौकट १) अपंग प्रकाशची चार किलोमीटर घाटातून सफर

ग्रामपंचायत काळजवडेमध्ये डेटा ऑपरेटर असणारे प्रकाश पाटील यांनी दगडधोंड्यातून पायी चालत काजिर्डा घाट उतरल्यानंतर काजिर्डाकरांनी अपंग प्रकाश यांना खांद्यावर उचलून जल्लोषपूर्ण स्वागत केले व शासनाचा जाहीर निषेध केला.

चौकट २)

काजिर्डा ग्रामपंचायतची सत्ता प्रथमत:च मनसे पक्षाची आल्यामुळे मनसे पक्षातील प्रमुख नेत्यांनी मशिनरी दिली आहे व आम्ही लोकवर्गणीतून हा घाट पूर्ण करून झोपलेल्या सरकारला जागे केल्याशिवाय मागे हटणार नाही आणि हा घाट पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही.

अशोक आरडे सरपंच

ग्रामपंचायत काजिर्डा.

चौकट ३)

छत्रपती शाहू महाराजांनी पडसाळीच्या जंगलात त्या काळी मुढा गड नावाचा गड बांधला आहे. अजूनही त्या ठिकाणी त्याचे पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. मात्र, शासनाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

प्रकाश पाटील .

चाफेवाडी

फोटो : पडसाळी काजिर्डा घाटाचे काम मनसेच्या सहकार्याने व लोकवर्गणीतून सुरू आहे.