शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक ऐक्याचे प्रतीक- श्री ज्योतिर्लिंग यात्रा म्हासुर्ली लेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST

धामणी खोऱ्याची जीवनदायिनी असलेल्या धामणी नदी काठावर आणि तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती सीमेवर वसलेल्या म्हासुर्लीसह (ता. राधानगरी) पंचक्रोशीचे आराध्य ...

धामणी खोऱ्याची जीवनदायिनी असलेल्या धामणी नदी काठावर आणि तीन तालुक्यांच्या मध्यवर्ती सीमेवर वसलेल्या म्हासुर्लीसह (ता. राधानगरी) पंचक्रोशीचे आराध्य दैवत ज्योतिर्लिंगाची चैत्र यात्रेचा आजचा पवित्र दिवस. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत आदी भेदभाव न पाहता सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेली ही यात्रा. मात्र, कोरोना या जागतिक महामारीचा पार्श्वभूमीवर गतवर्षीपासून ही यात्रा रद्द करण्यात आली असली तरी ही यात्रा महामारीच्या संकटावर मात करून पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देणारी ठरेल.

पंचक्रोशीतील जागरूक देवस्थान म्हणून ख्यातकीर्त असणारे येथील ग्रामदेवतांची ज्योतिर्लिंगाची चैत्र पौर्णिमेस दोन दिवस चालणारी ही यात्रा स्थानिक प्रशासनाच्या नियोजनानुसार भरविली जाते. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशातून या यात्रेत हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. लाखो रुपयांची उलाढाल असलेली ही धामणी खोऱ्यासह जिल्ह्यातील एक प्रमुख यात्रा. तमाशा आणि कुस्ती या दोन रांगड्या ग्रामीण कला जिवंत ठेवणारी यात्रा कोरोनाच्या प्रतिबंधासाठी यात्रेच्या शेकडो वर्षांच्या कालखंडात प्रथमच रद्द करण्यात आली. यात्रा रद्द झाली असली तरी मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर राखून श्रीच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत श्रीची पारंपरिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे सालंकृत पूजा करण्यात येणार असून, भाविकांसाठी मंदिर बंद राहणार आहे .

‘घरीच राहा, सुरक्षित राहा’

कोरोना या जागतिक संकटाचा सामना सर्वांनी एकजुटीने करावयाचा असून, सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचना व आदेशांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. सर्वांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखण्याबरोबरच लॉकडाऊनच्या काळातही सहकार्य करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडणे, नेहमी साबणाने हात धुणे, चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे, सकस आहार घेणे, सोशल डिस्टन्स पाळणे आदी सूत्रांचा वापर केल्यास कोरोनापासून बचाव करता येतो. याचबरोबर शेतीची कामे अगर इतर वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्स पाळावयाचे आहे. आपले घर, गाव, जिल्हा, राज्य सुरक्षित राहिले, तरच देश सुरक्षित राहील. ही सर्वांची वैयक्तिक व सामुदायिक जबाबदारी असून, यात जातपात, धर्म, उच्च-नीच, गरीब- श्रीमंत आणि राजकारण या गोष्टी टाळून आपण सर्वांनी एकजुटीने सामना करून या महामारीवर निश्चित विजय मिळवू.

गतवर्षीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द झाली असून, मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. भाविकांनी मंदिरात गर्दी न करता घरातूनच प्रार्थना करून आशीर्वाद घ्यावेत.

-दगडू दादू चौगले, यात्रा समितीप्रमुख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासनाने वेळोवेळी योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या असून, ग्रामस्थही काटेकोरपणे पाळत आहेत. लवकरच आपण यावर मात करू.

-सर्जेराव चौगले, अध्यक्ष, ज्योतिर्लिंग सेवा संस्था

या यात्रेस शेकडो वर्षांची परंपरा असून, यात्रेच्या इतिहासात गतवर्षीपासून यात्रा रद्द करण्यात येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी यात्रा रद्द करून आम्ही सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचवत आहोत.

-युवराज पाटील (सर), सामाजिक कार्यकर्ते