शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

स्विमर्सना ‘बॅक’स्ट्रोक

By admin | Updated: March 17, 2016 23:50 IST

जलतरण तलाव बंदचा फटका : नऊशेहून अधिकजणांचा सराव रखडणार

सचिन भोसले -- कोल्हापूर -विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जलतरण तलाव दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी जर कोल्हापुरात झाली तर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करणारे जलतरणपटू दोन महिने सरावापासून वंचित राहतील. याशिवाय सुमारे दहा हजारांहून अधिक हौशी जलतरणपटू , नवशिके आणि सुटीत पोहण्याचा आनंद लुटणारी मुले या निर्णयामुळे पोहण्यापासून दूर राहतील, अशी भिती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.सद्य:स्थितीत कोल्हापुरात एकूण सात जलतरण तलाव आहेत. यापैकी तीन महापालिकेचे, तर खासगी पाच जलतरण तलाव आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या अंबाई टँकमध्ये कमी तिकीट दर असल्याने सर्वसामान्य वर्गातील १६०० ते २००० मुले दिवसभरातील आठ बॅचेसमधून दररोज पोहण्याचा व शिकण्याचा आनंद लुटतात. याचसारखी स्थिती रमणमळा, शाहू जलतरण तलाव येथेही आहे. याशिवाय शिवाजी स्टेडियम ट्रस्टचा जलतरण तलाव, खासगी भवानी जलतरण तलाव, रेसिडेन्सी क्लब, सागर पाटील जलतरण तलाव अशा चारही ठिकाणी मोठे शुल्क भरूनही पोहण्याचा आनंद व स्पर्धेची तयारी करणाऱ्या जलतरणपटूंचा समावेश आहे. सुमारे दहा हजारांहून अधिक जण पोहण्याच्या आनंदापासून दूर राहणार आहेत. त्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंची संख्याही सुमारे ९०० इतकी आहे. त्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. कोल्हापूरने विरधवल खाडे, मंदार दिवसे यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू दिले आहेत. येथील जलतरण तलावातच त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. कोल्हापुरात इतर जिल्ह्यांसारखी पाणीटंचाई नाही. त्यामुळे या तलावांवर निर्बंध आणून हे बंद करू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेचे तलाव हे गोरगरिबांचे पोहणे, शिकणे व स्पर्धेची तयारी करणे याकरिता मोठा आधार आहेत. दुष्काळग्रस्त भागात आपले क्षेत्र मोडत नाही. याशिवाय हे पाणी काय दररोज भरावे लागत नाही. वारंवार हे पाणी फिल्टर करून वापरले जाते. त्यामुळे कोल्हापूरला वगळून हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी अन्य जिल्ह्यांत लागू करावा.- एस. डी. मोहिते, जलतरणपटू. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जलतरण तलावातून सुमारे ९०० जलतरणपटू येणाऱ्या विविध स्पर्धांकरिता सराव करीत आहेत. त्यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंचा समावेश आहे. त्यात विशेष म्हणजे पाण्याचे शुद्धिकरण सातत्याने होत असल्याने तेच पाणी पुन्हा तलावात सोडले जाते. त्यामुळे दररोज इतके पाणी लागत नाही. या निर्णयातून कोल्हापूरला वगळावे.- अजित सरनाईक, जलतरण प्रशिक्षक.सरकारच्या आदेशानुसार तो प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून कोल्हापुरातही अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यात महापालिका असो अथवा खासगी जलतरण तलावअसोत, आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.- प्रमोद बराले, इस्टेट विभागप्रमुख, मनपा.