शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

स्विमर्सना ‘बॅक’स्ट्रोक

By admin | Updated: March 17, 2016 23:50 IST

जलतरण तलाव बंदचा फटका : नऊशेहून अधिकजणांचा सराव रखडणार

सचिन भोसले -- कोल्हापूर -विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जलतरण तलाव दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी जर कोल्हापुरात झाली तर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करणारे जलतरणपटू दोन महिने सरावापासून वंचित राहतील. याशिवाय सुमारे दहा हजारांहून अधिक हौशी जलतरणपटू , नवशिके आणि सुटीत पोहण्याचा आनंद लुटणारी मुले या निर्णयामुळे पोहण्यापासून दूर राहतील, अशी भिती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.सद्य:स्थितीत कोल्हापुरात एकूण सात जलतरण तलाव आहेत. यापैकी तीन महापालिकेचे, तर खासगी पाच जलतरण तलाव आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या अंबाई टँकमध्ये कमी तिकीट दर असल्याने सर्वसामान्य वर्गातील १६०० ते २००० मुले दिवसभरातील आठ बॅचेसमधून दररोज पोहण्याचा व शिकण्याचा आनंद लुटतात. याचसारखी स्थिती रमणमळा, शाहू जलतरण तलाव येथेही आहे. याशिवाय शिवाजी स्टेडियम ट्रस्टचा जलतरण तलाव, खासगी भवानी जलतरण तलाव, रेसिडेन्सी क्लब, सागर पाटील जलतरण तलाव अशा चारही ठिकाणी मोठे शुल्क भरूनही पोहण्याचा आनंद व स्पर्धेची तयारी करणाऱ्या जलतरणपटूंचा समावेश आहे. सुमारे दहा हजारांहून अधिक जण पोहण्याच्या आनंदापासून दूर राहणार आहेत. त्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंची संख्याही सुमारे ९०० इतकी आहे. त्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. कोल्हापूरने विरधवल खाडे, मंदार दिवसे यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू दिले आहेत. येथील जलतरण तलावातच त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. कोल्हापुरात इतर जिल्ह्यांसारखी पाणीटंचाई नाही. त्यामुळे या तलावांवर निर्बंध आणून हे बंद करू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेचे तलाव हे गोरगरिबांचे पोहणे, शिकणे व स्पर्धेची तयारी करणे याकरिता मोठा आधार आहेत. दुष्काळग्रस्त भागात आपले क्षेत्र मोडत नाही. याशिवाय हे पाणी काय दररोज भरावे लागत नाही. वारंवार हे पाणी फिल्टर करून वापरले जाते. त्यामुळे कोल्हापूरला वगळून हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी अन्य जिल्ह्यांत लागू करावा.- एस. डी. मोहिते, जलतरणपटू. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जलतरण तलावातून सुमारे ९०० जलतरणपटू येणाऱ्या विविध स्पर्धांकरिता सराव करीत आहेत. त्यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंचा समावेश आहे. त्यात विशेष म्हणजे पाण्याचे शुद्धिकरण सातत्याने होत असल्याने तेच पाणी पुन्हा तलावात सोडले जाते. त्यामुळे दररोज इतके पाणी लागत नाही. या निर्णयातून कोल्हापूरला वगळावे.- अजित सरनाईक, जलतरण प्रशिक्षक.सरकारच्या आदेशानुसार तो प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून कोल्हापुरातही अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यात महापालिका असो अथवा खासगी जलतरण तलावअसोत, आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.- प्रमोद बराले, इस्टेट विभागप्रमुख, मनपा.