शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

स्विमर्सना ‘बॅक’स्ट्रोक

By admin | Updated: March 17, 2016 23:50 IST

जलतरण तलाव बंदचा फटका : नऊशेहून अधिकजणांचा सराव रखडणार

सचिन भोसले -- कोल्हापूर -विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जलतरण तलाव दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी जर कोल्हापुरात झाली तर जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची तयारी करणारे जलतरणपटू दोन महिने सरावापासून वंचित राहतील. याशिवाय सुमारे दहा हजारांहून अधिक हौशी जलतरणपटू , नवशिके आणि सुटीत पोहण्याचा आनंद लुटणारी मुले या निर्णयामुळे पोहण्यापासून दूर राहतील, अशी भिती जाणकारांकडून व्यक्त होत आहे.सद्य:स्थितीत कोल्हापुरात एकूण सात जलतरण तलाव आहेत. यापैकी तीन महापालिकेचे, तर खासगी पाच जलतरण तलाव आहेत. त्यामध्ये महापालिकेच्या अंबाई टँकमध्ये कमी तिकीट दर असल्याने सर्वसामान्य वर्गातील १६०० ते २००० मुले दिवसभरातील आठ बॅचेसमधून दररोज पोहण्याचा व शिकण्याचा आनंद लुटतात. याचसारखी स्थिती रमणमळा, शाहू जलतरण तलाव येथेही आहे. याशिवाय शिवाजी स्टेडियम ट्रस्टचा जलतरण तलाव, खासगी भवानी जलतरण तलाव, रेसिडेन्सी क्लब, सागर पाटील जलतरण तलाव अशा चारही ठिकाणी मोठे शुल्क भरूनही पोहण्याचा आनंद व स्पर्धेची तयारी करणाऱ्या जलतरणपटूंचा समावेश आहे. सुमारे दहा हजारांहून अधिक जण पोहण्याच्या आनंदापासून दूर राहणार आहेत. त्यात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय जलतरण स्पर्धेची तयारी करणाऱ्या खेळाडूंची संख्याही सुमारे ९०० इतकी आहे. त्यांनाही या निर्णयाचा फटका बसणार आहे. कोल्हापूरने विरधवल खाडे, मंदार दिवसे यांसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतरणपटू दिले आहेत. येथील जलतरण तलावातच त्यांनी आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. कोल्हापुरात इतर जिल्ह्यांसारखी पाणीटंचाई नाही. त्यामुळे या तलावांवर निर्बंध आणून हे बंद करू नयेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महापालिकेचे तलाव हे गोरगरिबांचे पोहणे, शिकणे व स्पर्धेची तयारी करणे याकरिता मोठा आधार आहेत. दुष्काळग्रस्त भागात आपले क्षेत्र मोडत नाही. याशिवाय हे पाणी काय दररोज भरावे लागत नाही. वारंवार हे पाणी फिल्टर करून वापरले जाते. त्यामुळे कोल्हापूरला वगळून हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी अन्य जिल्ह्यांत लागू करावा.- एस. डी. मोहिते, जलतरणपटू. जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या जलतरण तलावातून सुमारे ९०० जलतरणपटू येणाऱ्या विविध स्पर्धांकरिता सराव करीत आहेत. त्यामध्ये जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटूंचा समावेश आहे. त्यात विशेष म्हणजे पाण्याचे शुद्धिकरण सातत्याने होत असल्याने तेच पाणी पुन्हा तलावात सोडले जाते. त्यामुळे दररोज इतके पाणी लागत नाही. या निर्णयातून कोल्हापूरला वगळावे.- अजित सरनाईक, जलतरण प्रशिक्षक.सरकारच्या आदेशानुसार तो प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांशी चर्चा करून कोल्हापुरातही अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यात महापालिका असो अथवा खासगी जलतरण तलावअसोत, आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी लागेल.- प्रमोद बराले, इस्टेट विभागप्रमुख, मनपा.