शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

गोड बोलण्याने कटुता नष्ट होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 01:17 IST

गोड बोलण्याने कटुता नष्ट होते व सुसंवाद ठेवल्याने समोरच्याचे मन जिंकता येते या सूत्रानेच आपण काम करत आहे. याचा ...

गोड बोलण्याने कटुता नष्ट होते व सुसंवाद ठेवल्याने समोरच्याचे मन जिंकता येते या सूत्रानेच आपण काम करत आहे. याचा आतापर्यंतच्या प्रशासकीय कारकिर्दीमध्ये तोट्यापेक्षा फायदाच अधिक झाला आहे. गोड बोलूनही लोकांची कामे होतात या मताचे आपण आहोत. अनेकवेळा शासकीय अधिकारी व जनता यामध्ये होणारे वाद हे सुसंवाद नीट न झाल्यानेच होतात. त्यासाठी समोरच्याशी चांगल्या पद्धतीने व्यवहार आणि संवाद होणे गरजेचा आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रार ऐकली तरी लोकांना समाधान वाटते; त्यामुळे संबंधिताला त्याची बाजू मांडायला देणे, त्याचे शांतपणे ऐकून घेणे, खरोखरंच अन्याय झाला असेल तर त्यात स्वत: लक्ष घालून काम करणे, अशा पद्धतीने काम सुरू आहे. खालच्या पातळीवर न्याय न मिळाल्यानेच एखादा त्रस्त नागरिक आपल्याकडे तक्रार घेऊन येतो; त्यामुळे अशा प्रकरणांसाठी पर्सनल अटेंशन रजिस्टर (पीएआर) अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये आपण स्वत: वैयक्तिक लक्ष घालून आलेल्या तक्रारींबाबत संबंधित विभागाला कळवून त्याबाबत दर आठवड्याला होणाºया विभागप्रमुखांच्या बैठकीत आढावा घेतला जातो.आपल्याकडे आंदोलनाच्या निमित्ताने भेटायला येणाºया शिष्टमंडळांचा विचार करता, त्यांना खालच्या स्तरावरील प्रशासकीय यंत्रणेकडून न्याय मिळालेला नसतो व त्यांची बाजू योग्यप्रकारे ऐकून घेतलेली नसते. शेवटचा पर्याय म्हणून ते माझ्याकडे येत असतात. त्यामुळे त्या लोकांशी गोड बोलून शांतपणे ऐकून घेतल्यावर त्यांच्यामध्येही समाधानाचे व विश्वासाचे वातावरण निर्माण होते. आंदोलकांची बाजू प्रेमाने ऐकून घेऊन त्यांची सोडवणूक केल्यास ते समाधानाने परत जातात. तसेच एखादे काम हे नियमानुसार होत नसेल हे शांतपणे पटवून दिल्यास संबंधितालाही ते पटत. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ व शिवाजी पूल या ज्वलंत प्रश्नांवरील आंदोलनासंदर्भात वेळोवेळी भेटायला आलेल्या शिष्टमंडळाची भूमिका शांतपणे ऐकून घेऊन त्यांच्याशी गोड बोलून सुसंवाद ठेवला; त्यामुळे यातून चांगल्या पद्धतीने मार्ग निघून अंबाबाई मंदिर पुजाºयांचा कायदा झाला, तर शिवाजी पुलाचे काम सुरू होऊन ते महिन्याभरात पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.- अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी