शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

बुधवारपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील शाश्वत स्वच्छतेसाठी येत्या बुधवारपासून (दि.१५) ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर २०२१ ...

कोल्हापूर : ग्रामीण भागातील शाश्वत स्वच्छतेसाठी येत्या बुधवारपासून (दि.१५) ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत राहील. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अभियान ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गावात प्रभात फेरी, सायकल रॅलीचे आयोजन करणे, विशेष व्यक्तींच्या उपस्थित स्वच्छता श्रमदान फेरी, स्वच्छता श्रमदान उपक्रम, पर्यावरणपूरक गणेश उत्सव मूर्ती व निर्माल्य संकलन करणे, ओला कचरा व निर्माल्य व्यवस्थापन करणे, प्लास्टिकवर बंदी घालणे, हागणदारीमुक्त गाव करण्याची तारीख निश्चित करण्याचा ठराव करणे, ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक संकलन केंद्रे कार्यान्वित करणे, शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणांची स्वच्छता करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करणे तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, स्वच्छता सेनानीचा सत्कार करणे आदी उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबर स्वच्छ भारत दिवस उत्सव सर्व स्तरावर साजरा करणे, कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरण करणे, वापरा व फेका प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू, थैल्या न वापरणे, शोषखड्ड्याचे काम करणे, सेप्टीक टँक रिकामी करण्याची कामे करण्यात येणार आहे.