शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; दुबईत बॉलिवूडकरांसमोर संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बुधवारपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST

कोल्हापूर : ग्रामीण भागातील शाश्वत स्वच्छतेसाठी येत्या बुधवारपासून (दि.१५) ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर २०२१ ...

कोल्हापूर : ग्रामीण भागातील शाश्वत स्वच्छतेसाठी येत्या बुधवारपासून (दि.१५) ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत राहील. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अभियान ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गावात प्रभात फेरी, सायकल रॅलीचे आयोजन करणे, विशेष व्यक्तींच्या उपस्थित स्वच्छता श्रमदान फेरी, स्वच्छता श्रमदान उपक्रम, पर्यावरणपूरक गणेश उत्सव मूर्ती व निर्माल्य संकलन करणे, ओला कचरा व निर्माल्य व्यवस्थापन करणे, प्लास्टिकवर बंदी घालणे, हागणदारीमुक्त गाव करण्याची तारीख निश्चित करण्याचा ठराव करणे, ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक संकलन केंद्रे कार्यान्वित करणे, शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणांची स्वच्छता करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करणे तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, स्वच्छता सेनानीचा सत्कार करणे आदी उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबर स्वच्छ भारत दिवस उत्सव सर्व स्तरावर साजरा करणे, कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरण करणे, वापरा व फेका प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू, थैल्या न वापरणे, शोषखड्ड्याचे काम करणे, सेप्टीक टँक रिकामी करण्याची कामे करण्यात येणार आहे.