शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

‘दत्त’च्या रणांगणातून ‘स्वाभिमानी’ची माघार

By admin | Updated: July 19, 2014 00:32 IST

सभासद वाढविले : मल्टीस्टेट कायद्यातील अटीमध्ये मनमानी नियम केल्याचा आरोप

जयसिंगपूर : मल्टीस्टेट कायद्यातील जाचक अटी व साखर कारखान्याने पोटनियमात केलेल्या मनमानी नियमांमुळे तसेच शिरोळ ‘दत्त’ प्रशासनाने हितसंबंध डोळ्यांसमोर ठेवून वाढविलेल्या सभासदांमुळे दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, शुक्रवारी घेतला. प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्वाभिमानीने पत्रकाद्वारे दिली. स्वाभिमानीच्या जयसिंगपूर येथील प्रधान कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखाना निवडणुकीबाबत प्रमुख कार्यकर्त्यांनी मते मांडली. दत्त साखर कारखाना हा मल्टीस्टेट असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे, हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून साखर कारखान्याच्या निवडणुका आतापर्यंत लढविल्या आहेत. गेल्या पाच-सहा निवडणुकींचा अनुभव पाहता मल्टीस्टेट कायद्याचा आधार घेऊन सक्षम विरोधी उमेदवारांचे अर्ज छाननीत उडविले जातात. विरोध करणाऱ्या बहुतांश सभासदांचे सभासदत्व रद्द केले आहे. तसेच नवीन सभासद करताना हितचिंतकांचा जादा भरणा केला आहे. साखर कारखान्यांच्या निवडणुका या सभासद गटवार पद्धतीने घेतल्या जातात. मात्र, दत्त कारखान्याच्या प्रशासनाने कारखाना कार्यस्थळावर सर्व सभासदांना एकाच ठिकाणी मतदान करण्याची जाचक अट घातलेली आहे. गटवार पद्धतीने निवडणुका नसल्यामुळे सभासदांनाही अडचणीचे ठरते आहे. निवडणुकीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटना अलिप्त राहील. याचा अर्थ ‘स्वाभिमानी’ दत्त साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करीत आहे, असा होत नाही. दत्त कारखान्याच्या चुकीच्या निर्णयावर ‘स्वाभिमानी’ वेळावेळी प्रहार करून प्रशासनावर अंकुश ठेवणार आहे. तसेच बहुराज्यीय कायद्यातील जाचक अटी दूर करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचेही स्वाभिमानीने स्पष्ट केले आहे. यावेळी अण्णासाहेब चौगुले, उल्हास पाटील, सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, आदिनाथ हेमगिरे, के. आर. चव्हाण, डॉ. श्रीवर्धन पाटील, महेश पाटील, मिलिंद साखरपे उपस्थित होते. पोटनियमांच्या जाचक अटींमुळे आम्हाला सक्षम उमेदवार देता येत नाहीत. पाच वर्षांतील उसाच्या नोंदीचे रजिस्टर, सर्वसाधारण सभेचे हजेरीपत्रक सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात असते. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून आमच्या उमेदवारांचे अर्ज अपात्र होण्याची भीती होती. शिवाय कर्नाटकातील सभासद अधिक आहेत. यामुळे आतापर्यंत आम्हाला पूर्ण पॅनेल करता आले नाही. ‘स्वाभिमानी’ने आता कार्यपद्धती बदलली आहे. विधानसभेला ताकदीने आम्ही उतरु. - राजू शेट्टी, खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना