शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

‘स्वाभिमानी’ची लग्नाआधीच घटस्फोटाची तयारी-शेट्टी, तूपकर यांची रात्रभर मॅरेथॉन चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:55 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस या मित्र पक्षांसोबत लग्नाआधीच घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत शुक्रवारी रात्रभर कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये खासदार राजू शेट्टी, संघटनेचे राज्याध्यक्ष रविकांत तूपकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन

ठळक मुद्देराज्य कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा शक्य

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस या मित्र पक्षांसोबत लग्नाआधीच घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. याबाबत शुक्रवारी रात्रभर कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये खासदार राजू शेट्टी, संघटनेचे राज्याध्यक्ष रविकांत तूपकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन आघाडीसोबत काडीमोड घेण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला आहे. गुरुवारी (दि. २८) पुण्यात होणाºया राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

‘स्वाभिमानी’ने भाजपशी फारकत घेत कॉँग्रेस, राष्टÑवादीशी जुळवून घेण्यास सुरुवात केली. दोन्ही कॉँग्रेसच्या आघाडीत ‘स्वाभिमानी’ने सहभागी व्हावे, यासाठी दोन्ही कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर एकमत झाले. त्यानुसार ‘स्वाभिमानी’ला हातकणंगलेची जागा सोडून त्यांची उर्वरित मतदारसंघात मदत घेण्याचा निर्णय झाला. पण ‘स्वाभिमानी’ने बुलडाणा व वर्ध्याच्या जागेवरही दावा केल्याने पेच निर्माण झाला. या दोन्ही जागा कॉँग्रेसकडे आहेत. ‘स्वाभिमानी’ला रविकांत तूपकर यांच्यासाठी ‘बुलडाणा’, तर माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांच्यासाठी ‘वर्धा’ हवा आहे.

याबाबत, शुक्रवारी रात्री पाच तास कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये शेट्टी, तूपकर यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांची बैठक झाली. यामध्ये तीन जागा मिळत नसतील तर दोन्ही कॉँग्रेससोबत फरफटत जाऊ नये, यावर एकमत झाले. गुरुवारी पुण्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत स्वबळावर लढण्याची घोषणा करून किमान नऊ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी ‘स्वाभिमानी’ने केली आहे.स्वाभिमानी येथे लढणारहातकणंगले, कोल्हापूर, बुलडाणा, वर्धा, शिर्डी, माढा, सांगली, नाशिक, बारामती. 

ताकही फुंकून पिण्याची वेळसदाभाऊ खोत बाहेर पडल्याने तूपकर हे राज्य पातळीवरील एकमेव आक्रमक शिलेदार संघटनेत राहिले आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी यांना बुलडाणा घ्यावाच लागणार आहे. ‘हातकणंगले’साठी दोन्ही जागा सोडल्या, तर संघटनेत वेगळा संदेश जाईल. त्यामुळे आता शेट्टींना ताकही फुंकूनच प्यावे लागणार आहे. 

हातकणंगलेची जागा देण्याची तयारी दर्शवून दोन्ही कॉँग्रेसनी उपकार केले नाहीत. तिथे आमचा खासदार आहेच, बुलडाणा आणि वर्धा देत नसतील तर काडीमोड घ्या, अशी मानसिकता चळवळीतील कार्यकर्त्यांची आहे. याबाबत अंतिम निर्णय गुरुवारच्या कार्यकारिणी बैठकीत होईल.- प्रा. जालंदर पाटील, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीPoliticsराजकारण