शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

‘स्वाभिमानीचा मोर्चा म्हणजे बनवेगिरीचा कळस’

By admin | Updated: May 7, 2017 04:26 IST

सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल करीत ‘स्वाभिमानी’चा मोर्चा आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सहभाग म्हणजे बनवेगिरीचा कळस झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्यांना शेतकरीच मातीत घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारसह ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेवर आसूड ओढले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सर्वजण कर्जमाफीची मागणी करतात. या पक्षांचे सभागृहात स्पष्ट बहुमत असताना या मंडळींची सभागृहाबाहेर ‘नौटंकी’ सुरू आहे. सरकारविरोधातील मोर्चात राज्यमंत्री उतरतात आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे म्हणजे देवेंद्रजी, अजब तुमचे सरकार आणि धन्य धन्य ते मुख्यमंत्री, असेच म्हणावे लागेल, असेही ते म्हणाले.अस्थिकलश यात्राआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अस्थिकलश घेऊन मंत्रालयावर धडक मारण्यासाठी साखराळे (जि. सांगली) येथील विजय जाधव हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शनिवारी कोल्हापुरातून रवाना झाले. या यात्रेची दखल सरकारने घेतली नाही तर महाराष्ट्रातील ‘भोगी सरकार’ विरोधात उत्तर प्रदेशच्या ‘योगी सरकार’कडे दाद मागण्यासाठी तिथेपर्यंत यात्रा करण्याचा निर्धार जाधव यांनी केला.