शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
3
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
4
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
5
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
6
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
7
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
8
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
9
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
10
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
11
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
12
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
13
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
14
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
15
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
17
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
18
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
19
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
20
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!

‘स्वाभिमानी’जिल्हा परिषदेत सत्तेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:43 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीपासून ‘स्वाभिमानी’ने भाजपला साथ देत सत्तेत सहभाग घेतला;माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश यशस्वी झाला नाही आणि ....जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ‘स्वाभिमानी’कडे महिला व बालकल्याण सभापतिपद असल्याने ते येथील सत्तेतून बाजूला होण्याची शक्यता कमी आहे. दानोळीच्या शुभांगी शिंदे यांच्याकडे हे पद आहे.

लोकसभा निवडणुकीपासून ‘स्वाभिमानी’ने भाजपला साथ देत सत्तेत सहभाग घेतला; पण शेतकरी विरोधी सरकारच्या भूमिकेमुळे सरकार मधून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या मदतीने ‘स्वाभिमानी’ला मिळालेल्या पदांचे काय होणार? संघटना याबाबत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे. सध्या जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य आहेत, त्यात सभापतिपदाची जबाबदारीही आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार का? याविषयी उत्सुकता आहे; पण राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेताना जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे.

जिल्हा परिषदेशिवाय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत संघटनेचा एक ‘स्वीकृत प्रतिनिधी’ आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळातही संघटनेला संधी दिलेली आहे. या सर्वच ठिकाणी संघटना वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागच्या सभागृहातही स्वाभिमानी पाच वर्षे काँग्रेस सोबत सत्तेत राहिली. लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा उमेदवारानेच संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली तरी जिल्हा परिषदेतील सत्तेवर मात्र त्याचा कांहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आताही तोच कित्ता गिरवला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपलाही स्वाभिमानीची गरज आहेच. भविष्यात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश यशस्वी झाला नाही आणि शेट्टी व आवाडे यांनी कांही वेगळी भूमिका घेतली तरच जिल्हा परिषदेतील सत्तेत कांही बदल होवू शकतो. तूर्त तरी तशा कोणत्याही घडामोडी नाहीत.सध्या राज्य पातळीवरील सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काय करायचा याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.- प्रा. जालंदर पाटील (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष)