शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’जिल्हा परिषदेत सत्तेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:43 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीपासून ‘स्वाभिमानी’ने भाजपला साथ देत सत्तेत सहभाग घेतला;माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश यशस्वी झाला नाही आणि ....जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ‘स्वाभिमानी’कडे महिला व बालकल्याण सभापतिपद असल्याने ते येथील सत्तेतून बाजूला होण्याची शक्यता कमी आहे. दानोळीच्या शुभांगी शिंदे यांच्याकडे हे पद आहे.

लोकसभा निवडणुकीपासून ‘स्वाभिमानी’ने भाजपला साथ देत सत्तेत सहभाग घेतला; पण शेतकरी विरोधी सरकारच्या भूमिकेमुळे सरकार मधून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या मदतीने ‘स्वाभिमानी’ला मिळालेल्या पदांचे काय होणार? संघटना याबाबत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे. सध्या जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य आहेत, त्यात सभापतिपदाची जबाबदारीही आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार का? याविषयी उत्सुकता आहे; पण राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेताना जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे.

जिल्हा परिषदेशिवाय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत संघटनेचा एक ‘स्वीकृत प्रतिनिधी’ आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळातही संघटनेला संधी दिलेली आहे. या सर्वच ठिकाणी संघटना वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागच्या सभागृहातही स्वाभिमानी पाच वर्षे काँग्रेस सोबत सत्तेत राहिली. लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा उमेदवारानेच संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली तरी जिल्हा परिषदेतील सत्तेवर मात्र त्याचा कांहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आताही तोच कित्ता गिरवला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपलाही स्वाभिमानीची गरज आहेच. भविष्यात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश यशस्वी झाला नाही आणि शेट्टी व आवाडे यांनी कांही वेगळी भूमिका घेतली तरच जिल्हा परिषदेतील सत्तेत कांही बदल होवू शकतो. तूर्त तरी तशा कोणत्याही घडामोडी नाहीत.सध्या राज्य पातळीवरील सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काय करायचा याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.- प्रा. जालंदर पाटील (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष)