शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

‘स्वाभिमानी’जिल्हा परिषदेत सत्तेतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:43 IST

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीपासून ‘स्वाभिमानी’ने भाजपला साथ देत सत्तेत सहभाग घेतला;माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश यशस्वी झाला नाही आणि ....जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्य सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी जिल्हा परिषदेच्या सत्तेत ते कायम राहण्याची शक्यता अधिक आहे. सध्या ‘स्वाभिमानी’कडे महिला व बालकल्याण सभापतिपद असल्याने ते येथील सत्तेतून बाजूला होण्याची शक्यता कमी आहे. दानोळीच्या शुभांगी शिंदे यांच्याकडे हे पद आहे.

लोकसभा निवडणुकीपासून ‘स्वाभिमानी’ने भाजपला साथ देत सत्तेत सहभाग घेतला; पण शेतकरी विरोधी सरकारच्या भूमिकेमुळे सरकार मधून त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या मदतीने ‘स्वाभिमानी’ला मिळालेल्या पदांचे काय होणार? संघटना याबाबत काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता लागली आहे. सध्या जिल्हा परिषदेत ‘स्वाभिमानी’चे दोन सदस्य आहेत, त्यात सभापतिपदाची जबाबदारीही आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सत्तेतून ‘स्वाभिमानी’ बाहेर पडणार का? याविषयी उत्सुकता आहे; पण राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेताना जिल्हा पातळीवरील आघाड्यांबाबत स्थानिक कार्यकर्ते निर्णय घेतील, अशी संघटनेची सध्याची भूमिका आहे.

जिल्हा परिषदेशिवाय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत संघटनेचा एक ‘स्वीकृत प्रतिनिधी’ आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन मंडळातही संघटनेला संधी दिलेली आहे. या सर्वच ठिकाणी संघटना वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मागच्या सभागृहातही स्वाभिमानी पाच वर्षे काँग्रेस सोबत सत्तेत राहिली. लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचा उमेदवारानेच संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात निवडणूक लढवली तरी जिल्हा परिषदेतील सत्तेवर मात्र त्याचा कांहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे आताही तोच कित्ता गिरवला जाण्याचीच शक्यता अधिक आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपलाही स्वाभिमानीची गरज आहेच. भविष्यात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश यशस्वी झाला नाही आणि शेट्टी व आवाडे यांनी कांही वेगळी भूमिका घेतली तरच जिल्हा परिषदेतील सत्तेत कांही बदल होवू शकतो. तूर्त तरी तशा कोणत्याही घडामोडी नाहीत.सध्या राज्य पातळीवरील सरकार मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर काय करायचा याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.- प्रा. जालंदर पाटील (जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष)