शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ कोणाच्या मागे लागणार नाही

By admin | Updated: January 23, 2017 01:20 IST

राजू शेट्टी : उदगाव येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा; कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती

जयसिंगपूर : भाजपने सांगली, कोल्हापूर जिल्हे वगळता आम्हाला कोणत्याही जिल्ह्यात युतीबाबतची विचारणा केली नाही. आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभेत पराभूत झालो तरी चालेल, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या या विधानामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार, असा संकेत मिळत आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टीे म्हणाले, विजयाचे गणित जमविण्यासाठी आम्ही कसोसीने प्रयत्न करणार असल्याने या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार आहे. २३ फेबुु्रवारीला निवडणुकीचा निकाल लागणार असून, स्वाभिमानीच्या विजयी उमेदवारांनी कपाळाचा गुलाल पुसून कर्जमुक्तीसाठीच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. वर्षाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानी लढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुका वगळता सर्व जागा संघटनेच्या वतीने लढविल्या जातील. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाने केलेल्या युतीमुळे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून, स्वाभिमानीच किंगमेकर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, सध्या गावागावांत निवडणुकीचा आढावा घेत असून, शिरोळ तालुक्याचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी खासदार राजू शेट्टी जो निर्णय घेतील तो आम्हा शेतकऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल. स्वागत आदिनाथ हेमगिरे, तर प्रास्ताविक आण्णासाहेब चौगुले यांनी केले. यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सागर शंभूशेटे, बाजीराव देवाळकर, शहाजी पाटील, गोवर्धन दबडे, विक्रम पाटील, राजेंद्र गड्याण्णावर, राजाराम देसाई, संजय पाटील, शिवाजी माने, वसंत हजारे, विठ्ठल मोरे, संतोष पाटील, गुरू रिसगूड, जालिंदर ठोमके, विकास पाटील, शैलेश चौगुले, बंडु पाटील, मिलिंद साखरपे, एकनाथ जठार, अजित पवार, सीमा पाटील, सुवर्णा अपराज, अनंतमती पाटील, स्वाती पाटील, सुनंदा दानोळे, दीपाली ठोमके, प्रमिला पाटील, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) मी ‘स्वाभिमानी’चाचयावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण मी भाजपबरोबर सरकारमध्ये आहे. पण मी स्वाभिमानीचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी व माझी राम-लक्ष्मणाची जोडी तुटणार नसल्याचे खोत यांनी स्पष्ट करून विरोधकांच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे कार्यकर्त्यांना सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्ह्याचा दौरा सुरू असून, स्वाभिमानीला या निवडणुकीत चांगले यश मिळणार आहे.