शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

‘स्वाभिमानी’ कोणाच्या मागे लागणार नाही

By admin | Updated: January 23, 2017 01:20 IST

राजू शेट्टी : उदगाव येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा; कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती

जयसिंगपूर : भाजपने सांगली, कोल्हापूर जिल्हे वगळता आम्हाला कोणत्याही जिल्ह्यात युतीबाबतची विचारणा केली नाही. आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभेत पराभूत झालो तरी चालेल, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या या विधानामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार, असा संकेत मिळत आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टीे म्हणाले, विजयाचे गणित जमविण्यासाठी आम्ही कसोसीने प्रयत्न करणार असल्याने या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार आहे. २३ फेबुु्रवारीला निवडणुकीचा निकाल लागणार असून, स्वाभिमानीच्या विजयी उमेदवारांनी कपाळाचा गुलाल पुसून कर्जमुक्तीसाठीच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. वर्षाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानी लढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुका वगळता सर्व जागा संघटनेच्या वतीने लढविल्या जातील. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाने केलेल्या युतीमुळे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून, स्वाभिमानीच किंगमेकर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, सध्या गावागावांत निवडणुकीचा आढावा घेत असून, शिरोळ तालुक्याचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी खासदार राजू शेट्टी जो निर्णय घेतील तो आम्हा शेतकऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल. स्वागत आदिनाथ हेमगिरे, तर प्रास्ताविक आण्णासाहेब चौगुले यांनी केले. यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सागर शंभूशेटे, बाजीराव देवाळकर, शहाजी पाटील, गोवर्धन दबडे, विक्रम पाटील, राजेंद्र गड्याण्णावर, राजाराम देसाई, संजय पाटील, शिवाजी माने, वसंत हजारे, विठ्ठल मोरे, संतोष पाटील, गुरू रिसगूड, जालिंदर ठोमके, विकास पाटील, शैलेश चौगुले, बंडु पाटील, मिलिंद साखरपे, एकनाथ जठार, अजित पवार, सीमा पाटील, सुवर्णा अपराज, अनंतमती पाटील, स्वाती पाटील, सुनंदा दानोळे, दीपाली ठोमके, प्रमिला पाटील, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) मी ‘स्वाभिमानी’चाचयावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण मी भाजपबरोबर सरकारमध्ये आहे. पण मी स्वाभिमानीचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी व माझी राम-लक्ष्मणाची जोडी तुटणार नसल्याचे खोत यांनी स्पष्ट करून विरोधकांच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे कार्यकर्त्यांना सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्ह्याचा दौरा सुरू असून, स्वाभिमानीला या निवडणुकीत चांगले यश मिळणार आहे.