शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

‘स्वाभिमानी’ कोणाच्या मागे लागणार नाही

By admin | Updated: January 23, 2017 01:20 IST

राजू शेट्टी : उदगाव येथे ‘स्वाभिमानी’चा मेळावा; कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांची उपस्थिती

जयसिंगपूर : भाजपने सांगली, कोल्हापूर जिल्हे वगळता आम्हाला कोणत्याही जिल्ह्यात युतीबाबतची विचारणा केली नाही. आम्ही कोणाच्या मागे लागणार नाही. त्यामुळे आगामी लोकसभेत पराभूत झालो तरी चालेल, पण जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडून आणू, अशी ग्वाही खासदार राजू शेट्टी यांनी दिली. शेट्टी यांच्या या विधानामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणार, असा संकेत मिळत आहे. उदगाव (ता. शिरोळ) येथील कल्पवृक्ष सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी पार पडला. यावेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. खासदार शेट्टीे म्हणाले, विजयाचे गणित जमविण्यासाठी आम्ही कसोसीने प्रयत्न करणार असल्याने या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळणार आहे. २३ फेबुु्रवारीला निवडणुकीचा निकाल लागणार असून, स्वाभिमानीच्या विजयी उमेदवारांनी कपाळाचा गुलाल पुसून कर्जमुक्तीसाठीच्या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. वर्षाच्या आत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वाभिमानी लढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा तालुका वगळता सर्व जागा संघटनेच्या वतीने लढविल्या जातील. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाने केलेल्या युतीमुळे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसून, स्वाभिमानीच किंगमेकर ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक म्हणाले, सध्या गावागावांत निवडणुकीचा आढावा घेत असून, शिरोळ तालुक्याचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. चांगल्या कार्यकर्त्यांना निवडून देण्यासाठी खासदार राजू शेट्टी जो निर्णय घेतील तो आम्हा शेतकऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल. स्वागत आदिनाथ हेमगिरे, तर प्रास्ताविक आण्णासाहेब चौगुले यांनी केले. यावेळी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सागर शंभूशेटे, बाजीराव देवाळकर, शहाजी पाटील, गोवर्धन दबडे, विक्रम पाटील, राजेंद्र गड्याण्णावर, राजाराम देसाई, संजय पाटील, शिवाजी माने, वसंत हजारे, विठ्ठल मोरे, संतोष पाटील, गुरू रिसगूड, जालिंदर ठोमके, विकास पाटील, शैलेश चौगुले, बंडु पाटील, मिलिंद साखरपे, एकनाथ जठार, अजित पवार, सीमा पाटील, सुवर्णा अपराज, अनंतमती पाटील, स्वाती पाटील, सुनंदा दानोळे, दीपाली ठोमके, प्रमिला पाटील, सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) मी ‘स्वाभिमानी’चाचयावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, मी भाजपमध्ये जाणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण मी भाजपबरोबर सरकारमध्ये आहे. पण मी स्वाभिमानीचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे खासदार राजू शेट्टी व माझी राम-लक्ष्मणाची जोडी तुटणार नसल्याचे खोत यांनी स्पष्ट करून विरोधकांच्या अफवावर विश्वास ठेवू नये, असे कार्यकर्त्यांना सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी जिल्ह्याचा दौरा सुरू असून, स्वाभिमानीला या निवडणुकीत चांगले यश मिळणार आहे.