शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ स्वबळावर

By admin | Updated: January 18, 2017 01:10 IST

राजू शेट्टी : आमच्या विरोधकांची भाजपमध्ये भरती; निवडणुकीनंतरच आघाडी

कोल्हापूर : राज्याच्या राजकारणात आम्ही भाजपप्रणित महाआघाडीचा घटक असलो तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय खुला आहे. आम्ही स्वबळाची तयारी केली असून निवडणुकीनंतर भाजपशी की काँग्रेसशी आघाडी करायची याबाबत निर्णय घेऊ, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिली. भाजपमध्ये आमच्या विरोधकांची भरती सुरू असून निवडणुकीबाबत त्यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची वेळ जवळ आली तरी भाजपकडून आम्हाला अजून आघाडीसंदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. त्या पक्षाच्या नेत्यांना ‘स्वाभिमानी’शी चर्चा करायला कमीपणा वाटत असेल तर आम्हालाही सर्व राजकीय पर्याय खुले आहेत. गेल्या निवडणुकीतही आम्ही स्वबळावर लढलो होतो. यावेळेला सर्वच पक्षांची स्थिती इतकी वाईट आहे की त्यांना दहा जागा चिन्हांवर निवडून आणतानाही तोंडाला फेस येणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाच्या मागे न जाता स्वबळावर जास्त जागा निवडून आणू व त्यानंतर कुणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.गेल्या पाच वर्षांत आमची जिल्हा परिषदेत काँग्रेससोबत आघाडी होती, लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही आम्ही काँग्रेसच्या विरोधात लढलो; परंतु जिल्हा परिषदेतील सत्तेवर त्याचा कधीच परिणाम झाला नाही. काँग्रेसने पाच वर्षे सत्तेत वाटा देण्याचा ‘शब्द’ प्रामाणिकपणे पाळला. त्यामुळे चांगला प्रस्ताव आल्यास आम्ही त्यांच्यासोबतही आघाडी करू शकतो. आम्ही संघटना म्हणून ज्यांच्या विरोधात लढलो, लढत आहोत, अशांच्या गळ््यात गळे घालून भाजपचे नेते त्यांना पक्षात घेत आहेत. त्यामुळे अशा पक्षांशी आघाडी तरी कशी करायची; अशी विचारणा स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते करू लागल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.