शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
4
"तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
5
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
6
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
7
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
8
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
9
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
10
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
11
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
12
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
13
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
14
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
15
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
16
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
17
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
18
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
19
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
20
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती

‘स्वाभिमानी’ही ‘केडीसीसी’च्या रिंगणात

By admin | Updated: April 7, 2015 01:22 IST

राजू शेट्टी : चांगल्या लोकांना बरोबर घेऊन बँक वाचविणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या (केडीसीसी) रिंगणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे यांनी विविध गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केले. खासदार शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यातून विकास सेवा संस्था गटातून, सावकर मादनाईक यांनी प्रक्रिया संस्था, तर विठ्ठल मोरे यांनी नागरी बॅँक गटातून अर्ज दाखल केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांच्यासह आणखी कार्यकर्ते मंगळवार व बुधवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, जिल्हा बॅँक ही सर्वसामान्य माणसांची बॅँक आहे. विविध संस्थांचे रिझर्व्ह फंड, भागभांडवल या बॅँकेत गुंतले आहेत. या निधीवरील लाभांश व व्याजातून प्राथमिक संस्थांचा खर्च भागत होता; पण गेले दहा वर्षे लाभांश मिळत नसल्याने अनेक संस्था अडचणीत आल्या आहेत. नेते मंडळींच्या खाबूगिरीमुळे संस्था मोडीत निघाल्या आहेत. बॅँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांनी संचालक नको प्रशासकच हवा, अशी एकमुखी मागणी केली असताना याच मंडळींच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उड्या सुरू आहेत. जिल्हा बॅँकेत या लोकांचा आत्मा गुंतल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. जिल्हा बॅँक म्हणजे ग्रामीण विकासाचे मंदिर आहे; पण या मंडळींनी राजकारणाचा अड्डा बनविल्याने सामान्य माणूस अडचणीत आला. शेतकरी संघटनेने अर्ज दाखल केले आहेत, सभासदांचा प्रतिसाद कसा मिळतो, हे पहावे लागेल. वेळ प्रसंगी जिल्हा बॅँकेच्या भल्यासाठी एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तरी बेहत्तर, पण बॅँक वाचविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार असल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘राजें’चे स्वागतच!विक्रमसिंह घाटगे यांनी जिल्हा बँकेत यावे, याबाबत विचारले असता, जिल्ह्यात अनेक संस्था चांगल्या चालल्या आहेत. बॅँकेच्या भल्यासाठी अशा मंडळींनी पुढे यायलाच हवे, विक्रमसिंह घाटगे यांचे स्वागतच करू, असे शेट्टी यांनी सांगितले. मोडीत काढणारेच वाचविण्यास पुढेज्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे जिल्हा बॅँक अडचणीत आली, त्याच मंडळींचा अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी उसळली आहे. बॅँक मोडीत काढणारेच वाचविण्यासाठी पुढे असल्याची टीका खासदार शेट्टी यांनी केली.खरेदी-विक्रीला बळी पडू नकाचांगली माणसे निवडणुकीत उतरली नाही, तर ज्यांनी बॅँक संपविली तीच मंडळी पुन्हा सत्तेवर येतील. माझे ठरावधारकांना आवाहन आहे, त्यांनी मतांची खरेदी-विक्री करू नये, चांगल्या माणसांना पाठवावे, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले. ‘गोकुळ’बाबत योग्य वेळी भूमिकाजिल्हा बॅँकेत आम्ही उतरलोच आहे, ‘गोकुळ’च्या निवडणुकीवर आम्ही लक्ष ठेवून आहे. योग्य वेळी भूमिका घेऊ, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.