शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

सामाजिक न्याय देणारा शाश्वत विकास महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST

गडहिंग्लज : औद्योगिकरणामुळे विकासाच्या प्रक्रियेला गती मिळाली. परंतु, हा विकास सर्वसामान्यांना उपयुक्त न ठरता भांडवली व्यवस्थेला पूरक बनला आहे. ...

गडहिंग्लज : औद्योगिकरणामुळे विकासाच्या प्रक्रियेला गती मिळाली. परंतु, हा विकास सर्वसामान्यांना उपयुक्त न ठरता भांडवली व्यवस्थेला पूरक बनला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करणाऱ्या शाश्वत विकासाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत डॉ. प्रवीण सप्तर्षी (अमेरिका) यांनी केले.

गडहिंग्लज येथील डॉ. घाळी महाविद्यालयातर्फे आयोजित ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी चर्चासत्राचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. सतीश घाळी होते. प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिर्के म्हणाले की, मानवी विकासासाठी सर्व शाखांमधून होणारे संशोधन महत्त्वाचे असते. त्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणातून मूलभूत संशोधनाला महत्त्व देण्यात आले आहे. संशोधन सर्वसमावेशक आणि समाजोपयोगी असले पाहिजे.

पाटील म्हणाले की, शाश्वत विकासासाठी पाण्याचे व्यवस्थापन गरजेचे असून, पाण्याशिवाय विकासाची व्याख्या पूर्ण होऊ शकत नाही. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी औष्णिक आणि सौरऊर्जेसाठी अधिक संशोधन करायला हवे.

पहिल्या सत्रात डॉ. गजानन घोडके (द. कोरिया) यांनी ग्रीन केमिस्ट्रीमधील १२ तत्त्वांचा वापर करून शाश्वत विकास साध्य करण्याबाबत विवेचन केले. घातक रसायनांचा वापर टाळून सुरक्षित रसायनांचा वापर आणि वस्तूंचा पुनर्वापर करण्याची मानसिकता रुजवायला हवी.

दुसऱ्या सत्रात डॉ. दत्तात्रय ढवळे (कतार) यांनी नॅनो मटेरिअल्सचा वापर करून औषधे व रसायनांची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात निशी लॉक्सिमॉन (मॉरिसिस) यांनी मराठी भाषेचा विकास आणि परदेशातील तिचे उपयोजन याची मांडणी केली.

परिषदेस भारतातून विविध राज्यांसह परदेशातील अमेरिका, आफ्रिका, उझबेकिस्तान, ट्युनिशिया, अझरबैझान, मॉरिसिस येथील १८१ हून अधिक शोधनिबंध प्राप्त झाले. ३२७ लोकांनी नोंदणी करून परिषदेस उपस्थिती दर्शविली.

प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले. परिषदेचे मुख्य समन्वयक अनिल गोडघाटे, सहसमन्वयक डॉ. दत्तात्रय वाघमारे, डॉ. नीलेश शेळके यांनी नियोजन केले.