शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ग्राहकांशी मगु्ररीने वागाल तर जाग्यावर निलंबन; हसन मुश्रीफ यांचा कर्मचाऱ्यांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:43 IST

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या शाखांत येणाºया प्रत्येक ग्राहकाची सौजन्याने विचारपूस करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करा. ग्राहकांशी मगु्ररीने वागल्याची तक्रार आल्यास जाग्यावर निलंबित केले जाईल. कोणाचीही गय करणार नसल्याचा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. आर्थिक वर्षातील सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. आपली मक्तेदारी संपली असून, ग्राहकांच्या घरापर्यंत ...

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या शाखांत येणाºया प्रत्येक ग्राहकाची सौजन्याने विचारपूस करून व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करा. ग्राहकांशी मगु्ररीने वागल्याची तक्रार आल्यास जाग्यावर निलंबित केले जाईल. कोणाचीही गय करणार नसल्याचा इशारा जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला. आर्थिक वर्षातील सहा महिन्यांचा कालावधी राहिला आहे. आपली मक्तेदारी संपली असून, ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन व्यवसाय वृद्धीचा इष्टांक पूर्ण करा, असे आवाहनही त्यांनी केले.जिल्हा बॅँकेच्या ८० व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी आयोजित कर्मचाºयांच्या मेळाव्यात ते बोलत होते.हसन मुश्रीफ म्हणाले, गेल्यावर्षी दिलेले उद्दिष्ट आणि पूर्तता यांची तुलना केली तर आपण खूप मागे राहिलो. तरीही काटकसरीचा कारभार करून संस्थांना आठ टक्के लाभांश आणि कर्मचाºयांना नऊ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला. साखरेला हमीभाव मिळाल्याने साखर उद्योग स्थिरावला आहे. आता साखर उद्योगाला कर्ज देण्याची भीती नाही; पण आपल्याकडे पैसे कमी पडतात. त्यासाठी शेअर्स भांडवल व ठेवी गोळा करण्यासाठी कामाला लागा. मुदत संपलेल्या ठेवी पुन्हा आपल्याकडे कशा राहतील, यासाठी प्रयत्न करा. आम्ही प्रामाणिकपणे काम करीत आहोत, तसे तुम्हीही करा. पूर्वीचे दिवस विसरा. मक्तेदारी संपली असून काम करणारेच करत राहतात इतरजण पुढारीपण करीत असल्याच्या युनियनच्या तक्रारी आहेत. रजा न टाकता कोणी उद्योग करीत असेल तर त्याचे नुसते नाव कळवा; तो कितीही जवळचा असला तरी त्याची गय करणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, व्यवस्थापक जी. एम. शिंदे, बी. एस. कालेकर, रणवीर चव्हाण, संचालक पी. जी. श्ािंदे, भैया माने, अनिल पाटील, उदयानी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.मुश्रीफ यांच्यामुळेच बँक सक्षमहसन मुश्रीफ यांच्या कुशल नेतृत्वामुळेच १७४ कोटींचा संचित तोटा कमी करून बॅँक नफ्यात आली. त्यांचे कागलमधील राजकारण काय असेल ते असेल; पण त्यांनी बॅँकेतील चुकीचे पायंडे बंद केल्याचे पी. जी. शिंदे यांनी सांगितले.तुमच्याप्रमाणे बँकेचा इंडेक्स वाढवाबॅँकेचे आतापर्यंत ७०० कर्मचारी सेवानिवृत्त झाले तरी पगारात वाढ होत गेली. दर तीन महिन्यांनी इंडेक्सप्रमाणे पगारात वाढ होत असल्याने आता पगारावर १०० कोटी खर्च होतो. तुमचा इंडेक्स वाढतो तसा बॅँकेचाही वाढवा, असा चिमटा मुश्रीफ यांनी काढला.‘महालक्ष्मी’ पुनर्गुंतवणूकयोजनेचा प्रारंभतीन वर्षे मुदतीच्या व १०.५२ टक्के व्याजाच्या ‘महालक्ष्मी पुनर्गुंतवणूक ठेव योजने’चा प्रारंभ करण्यात आला. यामध्ये पाच हजारांपासून ठेव ठेवता येणार असून डिसेंबर २०१८ पर्यंत मुदत राहणार आहे.